
Tej Police Times
शिवडी नाव्हाशेवा सागरी सेतूवर २५० रुपये टोल आकारण्यात येणार आहे यासंदर्भातील निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे. एमएमआरडीएने ५०० रुपये टोल आकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, राज्य सरकारनं २५० रुपये टोल आकारणीचा निर्णय घेतला.
दीपक केसरकर म्हणाले की, २२ किलोमीटरचा ब्रीज आहे. याच्यामुळं जिथं ७ लीटर तेल लागतं तिथं १ लीटर तेल लागणार आहे. वाहनचालकांचे पाचशे ते सहाशे रुपये वाचणार आहेत. आम्ही या प्रकल्पासाठी कर्ज घेतलेलं आहे. भारत सरकारच्या नियमाप्रमाणं यासाठी ५०० रुपये टोल द्यावा लागणार होता. आजच्या मंत्रिमंडळात अतिशय महत्त्वाचा निर्णय झाला असून टोल २५० रुपये करण्याचा निर्णय झालेला आहे.
श्रीरामांविषयी वक्तव्य अभ्यासपूर्णच, पण भावना दुखावल्यास खेद, जितेंद्र आव्हाडांनी पुरावे दाखवले
या निर्णयामुळं महाराष्ट्र आणि मुंबईचा विकास होईल. मुंबईपासून १५ किमीच्या अंतरावर विकासाचं केंद्र विकसित होईल. २५० रुपये हा प्रति किमीचा कमी टोल आहे. ज्यांना काही कळत नाही ते कुणालाही काहीही बोलत असतात, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. २००५ पूर्वी ज्यांच्या नोकरीच्या जाहिराती निघाल्या होत्या त्यांना जुन्या पेन्शनचा लाभ दिला जाईल, असा निर्णय घेतला असं दीपक केसरकर म्हणाले.
दरम्यान, वाहनांच्या प्रकारानुसार टोल आकारणीचे दर वेगवेगळे असतील. राज्य सरकारकडून आणि एमएमआरडीएकडून अधिक माहिती आल्यानंतर ते स्पष्ट होईल.
भारताच्या धाडधाड विकेट गेल्यावर रवी शास्त्री वैतागले; म्हणाले- ‘टॉयलेटला जर कोणी गेला असेल तर तो येईपर्यंत…’
रोहित पवार अजून लहान, पहिल्या टर्मचे आमदार, मी त्यांच्याकडे फार लक्ष देत नाही: जितेंद्र आव्हाड
Recover your password.
A password will be e-mailed to you.