
Tej Police Times
त्यामुळे आजघडीला जिल्ह्यात पाणीसाठ्यात घट लक्षणीय आली आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यातील २१ प्रकल्प कोरडे पडले आहेत, तर ६० प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली गेले आहे. त्याचप्रमाणे २७ प्रकल्पांत २५ टक्क्यांहून कमी पाणी शिल्लक आहे. त्याचप्रमाणे १८ प्रकल्पांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत पाणी आहे. जिल्ह्यातील २६ प्रकल्पांत ५० टक्क्यांहून अधिक पाणी आहे, तर १४ तलावांत ७५ टक्क्यांहून अधिक साठा शिल्लक आहे.
छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठी बातमी! आता मिळणार ‘२४ बाय ७’ पाणी, केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा
तीन जिल्हे अवलंबून
जिल्ह्यातील माजलगाव प्रकल्पाची क्षमता ४५४ दशलक्ष घनमीटर असताना ३३९ दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा असून ते जिल्ह्यातील मांजरा व माजलगाव हे मोठे प्रकल्प तीन जिल्ह्यातील जनतेची तहान भागवतात.
या दोन मोठ्या प्रकल्पावरून बीड, अंबाजोगाई, केज, लातूर, कळंब, धारूर, केज, माजलगाव या मोठ्या शहरासह अनेक खेड्यांत पाणीपुरवठा होतो.
जिल्ह्यातील लहान, मध्यम आणि मोठ्या मिळून १६६ सिंचन प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता ९७५ दशलक्ष घनमीटर आहे. त्या तुलनेत सध्या उपयुक्त पाणीसाठा १४५ दशलक्ष घनमीटर तर मृतसाठा १९३ दशलक्ष घनमीटर शिल्लक आहे. आगामी काळात या जिल्ह्यातील एकशे चवेचाळीस सिंचन प्रकल्प तळाशी गेल्याने पाणी टंचाई भीषण होण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणी पुरवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.