Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नागपूरात वाहतूक नियमांची पायमल्ली; २०२३मध्ये १२ लाखांवर केसेस, वाहतूक पोलिसांचा वचक संपला?

10

नागपूर : गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीतील वाहतूकव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. वाहतूकव्यवस्थेच्या शिस्तीचा ‘सातबारा’ काढण्यासाठी वाहतूक शाखेच्या अलीकडच्या काळातील एकाही अधिकाऱ्याने पुढाकार घेतलेला दिसून येत नाही. वाहतूकव्यवस्था कधी मार्गावर येईल हे ‘देव’च जाणे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नागपुरात वाहतूक पोलिसांचा वचक संपल्याचे धक्कादायक वास्तव आहे. येथे वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची संख्या बारा लाखांवर गेली आहे.

गेल्यावर्षी २०२३मध्ये १२ लाख ३९ हजार ५१८ जणांची वाहतुकीचे नियम तोडले. २०२२मध्ये ही संख्या ९ लाख ७३ हजार ९३९ होती. गेल्यावर्षी यात २ लाख ६५ हजार ५७९ने वाढ झाली. वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांचा चालान कारवाईवरच गेल्यावर्षी सर्वाधिक भर असल्याचे आकडेवारीवरून दिसते.
उपराजधानीत पायी चालणेही कठीण; गेल्या वर्षभरात प्राणांतिक अपघातांत गेले २८६ जीव
मुख्य चौकात तसेच सिग्नलवर वाहतूक पोलिस तैनात नसल्याने सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांची संख्याही नागपुरात सर्वाधिक आहे. गेल्यावर्षी ६२ हजार १०१ वाहनचालकांनी सिग्नलचे पालन केले नाही. २०२२मध्ये हा आकडा ३३ हजार ८८५ होता. २८ हजार २१६ एवढा या वर्षांतील फरक आहे. दुसऱ्या क्रमांकावर विनापरवाना वाहन चालकविणारे आहेत. २०२३मध्ये परवाना नसतानाही वाहने रस्त्यांवर दामटणाऱ्या ३१ हजार ७७१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. २०२२मध्ये ही संख्या ४ हजार ४७४ एवढी अत्यल्प होती. गेल्यावर्षी यात तब्बल २७ हजार २९७ एवढी वाढ झाली. प्रत्यक्षात हा आकडा आणखी मोठा आहे.

वाहने चालविताना ‘प्रेशर हॉर्न’चा वापर करणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अनेक बुलेटस्वारांमध्ये तर प्रेशर हॉर्न वाजविण्याची स्पर्धाच असते. २०२२मध्ये पोलिसांनी प्रेशर हॉर्नचा वापर करणाऱ्या २४१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. २०२३मध्ये यात १५ हजार ९२७ने वाढ झाली. गेल्यावर्षी पोलिसांनी १६ हजार १६८ चालकांविरुद्ध चालान कारवाई केली.

रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने पार्क करणाऱ्यांची संख्याही उपराजधानीत वाढ आहेत. गेल्यावर्षी ८८ हजार १८७ वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. २०२२मध्ये हा आकडा ७७ हजार १५ इतका होता. २०२३मध्ये यात ११ हजार १७२ने वाढ झाली. स्टॉपलाइनसमोर वाहने उभे करणाऱ्या ९ हजार ४१३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. २०२२मध्ये ही संख्या केवळ ३ होती.

नियमतोडे दृष्टिक्षेपात…
-सिग्नल तोडणारे : ६२,१०१
-विनापरवाना : ३१,७७१
-प्रेशर हॉर्न वाजवणारे : १६,१६८
-भरधाव वेगवाले : २१,०८५
-रस्त्यावर वाहने लावणारे ८८,१८७
(२०२३ची स्थिती)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.