
Tej Police Times
कोण पात्र, कोण अपात्र? शिवसेनेच्या आमदारांचे आज ठरणार भवितव्य; अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष
याबाबत कंपनीच्या संचालक झेलम चौबळ यांनी सांगितले की, ‘मालदीव हा भारताचा जुना मित्र असून, पर्यटनाच्या बाबतीत हा देश बव्हंशी भारतावर अवलंबून आहे. मात्र, त्यांनी राष्ट्र म्हणून भारताचा आणि आपल्या पंतप्रधानांचा केलेला अपमान कदापि सहन करणार नाही. एक वर्ष मालदीवच्या पर्यटनाला न गेल्याने भारतीय पर्यटकांना काहीही फरक पडणार नाही. येथील पर्यटक आणि आम्हा भारतीयांसाठी अख्खे जग खुले आहे. पण, मालदीवसाठी भारत महत्त्वाचा आहे, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवे. मालदीवच्या सहली रद्द करण्यात आल्या आहेत.’
देशहितार्थ व राष्ट्रसन्मानाचा विचार करून ‘केसरी टूर्स’ने याआधी कॅनडाच्या सहली रद्द केल्या होत्या. कॅनडा सरकारने भारताविरुद्ध घेतलेल्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी कंपनीने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचा अपमान भारतीय कधीच सहन करणार नाहीत. त्यामुळेच भारतीय पर्यटकांच्या भावनेचा आदर करून आम्ही चालू मोसमातील मालदीवच्या सर्व सहली रद्द केल्या आहेत.
-झेलम चौबळ, संचालक, केसरी टूर्स
राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजन यांचा दावा, म्हणाले पंधरा दिवसांत….
Recover your password.
A password will be e-mailed to you.