
Tej Police Times
सर्वोच्च न्यायालयात सुनील प्रभु यांची प्रतोद म्हणून नियुक्ती योग्य ठरवली आणि भरत गोगावले यांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा गैरसमज काहींनी समाजात पसरवला आहे. मात्र सत्य परिस्थिती ही आहे की- ज्यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहळी झिरवळ यांनी मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू आणि गटनेते म्हणून अजय चौधरी यांना निवडलं, त्यावेळी त्यांच्याकडे फक्त उद्धव ठाकरे यांचं पत्र होतं, एकनाथ शिंदे यांचं कोणतंही पत्र झिरवळ यांच्याकडे नव्हतं. त्यामुळे त्यांना एकच राजकीय पक्ष असल्याचं वाटलं. त्यामुळे त्या परिस्थितीत त्यांनी अनुक्रमे प्रभू आणि चौधरी यांची निवड केली.
पण ३ जुलै २०२२ रोजी माझी विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर मी गोगावले आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबत निर्णय घेतला. कारण त्यावेळी माझ्याकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशी दोघांची पत्रे होती आणि मला पक्षात फूट पडल्याची कल्पना होती.
अशा परिस्थितीत त्यावेळी मी केवळ विधिमंडळातील ताकद पाहून गोगावले आणि शिंदेंची केलेली निवड चुकीची आहे, असं सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं. आधी राजकीय पक्ष कोणता आहे हे ठरवायला हवं, असे सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष म्हणून मला निर्देश दिले. त्या निर्देशावरच मी मूळ राजकीय पक्ष कुणाचा, अधिकृत प्रतोद आणि पक्षनेता कोण हे ठरवले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे पाळूनच मी निर्णय दिल्याचा पुनरुच्चार राहुल नार्वेकर यांनी केला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.