Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन

8

प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना कळायला हवं. महाराष्ट्रावर राज्य करणाऱ्या मराठ्यांच्या जमिनी जात आहेत, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते सोमवारी अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. स्थानिक लोक जमिनी विकत आहेत यासंदर्भात मी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याजवळ भेटीमध्ये बोललो आहे व याचसाठी मी तिथे गेलो होतो त्यांच्याकडे फार मोठी ताकद आहे त्यांच्या माध्यमातून यासाठी लोकांचे प्रबोधन करावे, यात कारणासाठी आपण निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट घेतली की माहिती त्यांनी यावेळी दिली. स्थानिकांनी जमिनी विकू नयेत, अन्यथा कपाळाला हात मारण्याची पाळी येईल, असाही इशारा यावेळी राज ठाकरे यांनी दिला आहे.

बाकीचे लोक कसे हुशारीने घुसतात आणि आपण किती बेसावध आहोत,आपण किती भोळसटपणे वागत आहोत. तुम्ही या सगळ्यांनी याचा पहिला विचार करा. ही काही आजची जाहीर सभा नाही. मात्र, हे आपल्या वरती महाराष्ट्र वरती येणारा आक्रमण आहे. या सगळ्याबद्दल मला चर्चा करायची होती गप्पा मारायच्या होत्या. मी एकटा बोलतोय आणि तुम्ही ऐकताय हे मला आज अपेक्षितच नव्हते, असे राज ठाकरे यांनी म्हटले. पत्रकार म्हणून तुमच्यावर लोकांचा विश्वास आहे. पेपरमध्ये आलेली बातमी ही ऑथेंटिक असते आणि म्हणूनच मला रायगडमध्ये तुम्ही काय भूमिका निभावणार आहात, याबाबत मला रायगड जिल्ह्यातील पत्रकारांजवळ चर्चा करायची होती असे राज ठाकरे यांनी सांगितले.

टोपी, टिकली, बांगड्या अन् मेकअप; परिक्षा द्यायला ‘तो’ मुलगी बनून आला; स्टोरी ऐकून सारेच चकित

मराठी माणसाच्या पायाखालची जमीन निघून चालली आहे याचा आपल्याला अंदाज आहे का? असाही सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. आपल्याला आता इथे आल्यावर ती माहिती मिळाली की अलिबागच्या जवळपासच्या गावांमधील जमिनी संपल्या मग येथील माणसं कुठे गेली जर का तुमच्या हक्काची जमीन नसेल तर तुम्ही कुठलेही नागरिक नाही आहा,त अशा शब्दात राज ठाकरे यांनी कान टोचले आहेत.

अनेक दलाल फिरत आहेत आणि हेच दलाल तुमच्याकडून एक रुपयाने जमीन घेऊन सरकारला हजार रुपयांनी विकतात. तुम्ही दुबईमध्ये व्यवसाय करायला गेला तर तुम्हाला दुबईमधील एखादा अरब पार्टनर म्हणून घ्यावा लागतो मग जर रायगड जिल्ह्यात उद्या जर का असे प्रोजेक्ट येणार असेल तर तुम्ही त्या प्रोजेक्टमध्ये पार्टनरशिप का मागत नाही, असा सवालच राज ठाकरे यांनी उपस्थित केला

ट्रेनमध्ये उर्दूत संभाषण ऐकलं, ‘मातोश्री’बाहेर घातपाताचा कट, नियंत्रण कक्षाला फोनवरुन दावा
कोकणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सगळीकडे हा प्रकार सुरू आहे तुमच्या जमिनीत तुमच्या हातून चालल्या आहेत. नेरळ, कर्जत या परिसरात जमिनी घेऊन कोणी फ्लॅट घेतले आहेत, ते जरा बघा. परप्रांतीय जमिनीवर आक्रमण करून जितक्या शांतपणे पोखरत आहेत तितक्याच शांतपणे आपण जमिनी वाचवल्या पाहिजेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, पुणे,ठाणे, पनवेल येथे आता भाषा बदलली आहे. अलिबाग व परिसरातली भाषा हळूहळू बदलायला लागेल. ठाणे जिल्हा हा अख्ख्या जगात असा एकमेव जिल्हा आहे की, त्या जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. भारतात असा एकमेव जिल्हा आहे की सात महानगरपालिका आहे जिथे लोकसंख्या बाहेरून येणाऱ्या परप्रांतीयांनी वाढवली आहे. नाणार येथे जे झालं गुजराती, मारवाडी यांच्या नावे जमिनी दिसत आहेत. मात्र ते फ्रंटला आहेत त्यांच्या मागे वेगळेच आहेत. तेच सगळीकडे होणार आहे. कुंपण शेत खाते अशा शब्दात राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या सगळ्या संदर्भात स्थानिक लोकांजवळ पत्रकारांनी बोलून प्रबोधन केलं पाहिजे, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

राज ठाकरेंनी शालेय जीवनात पाहिलेल्या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतीचं नाव सांगताच सभागृहात हशा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.