
Tej Police Times
तक्रारीनुसार, शुक्ला यांनी ८ जानेवारी रोजी वरळी येथील बार्बेक्यू नेशनमधून शाकाहारी जेवण मागवले. यातील दालमखनी खाल्ल्यानंतर त्यांना चव विचित्र लागली. त्यांनी पडताळून पाहिले असता त्यामध्ये मृत उंदीर आणि झुरळ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोटदुखी, मळमळ असा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांनी पालिकेच्या नायर रुग्णालयात धाव घेतली. अन्नातून विषबाधा झाल्याचे प्रकरण असल्याने रुग्णालयाने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तिथे येऊन चौकशी केली व पुढे ‘एफडीए’लाही कळवले, असे शुक्ला यांनी सांगितले.
कायद्याचे अभ्यासक असलेल्या शुक्ला यांनी बार्बेक्यू नेशनकडे ई-मेलद्वारे तक्रार केली. ‘या प्रकाराने अन्नावरची इच्छाच उडून गेली आहे. सतत तोच प्रसंग आठवून आहार घेऊ नये, असे वाटते’, असे त्यांनी सांगितले. या संपूर्ण प्रकरणाची माहिती त्यांनी ‘एक्स’वर दिली आहे.
पेस्ट कंट्रोल केल्याचे आढळले
‘एफडीए’ने या तक्रारीनंतर वरळी येथील बार्बेक्यू नेशन्समध्ये जाऊन तपासणी केली. तिथे पेस्ट कंट्रोल केल्याचे त्यांना आढळले. तक्रार १२ जानेवारी रोजी प्राप्त झाल्याने ८ जानेवारीचे नमुने त्यांना मिळाले नाहीत. आता घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल लवकरच येतील, अशी माहिती निरीक्षक अधिकारी लक्ष्मीकांत तावळे यांनी दिली.
मुलाला मारण्याआधी गायली अंगाई; कफ सिरप, डॉक्टरांना फोन अन्.. सूचनाने चौकशीत काय-काय सांगितलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.