
Tej Police Times
आपण गेल्या १३ महिन्यात ८ योजनांना मान्यता दिलीय. मीही विदर्भ या दुष्काळी भागातून येतो. त्यामुळे याचे दुःख मला माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदींना भेटून सांगितले, की आमच्या शेतकऱ्यांना योजना द्या. त्यांनी बळीराजा योजना दिली, असेही फडणवीस यांनी सांगितले.
दुष्काळ संपवण्यासाठी शेतीच्या बांधावर पोहचवणार आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. या भागात तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त करण्यासाठी उद्योग आणण्याचे काम करत आहे. जे काम करतात, त्यांना आशीर्वाद द्या. आम्ही या नेत्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. आपल्या जिल्ह्यात नवीन कॉरिडॉर होत आहे. त्यामुळे येथील तरुणांना रोजगार येणार आहेत, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून आम्ही योजना करण्याचे आखली. हे पुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळवले, तर मोठा फायदा येथील जनतेला होईल. हा ३३०० कोटींचा प्रकल्प आहे. त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यताही दिली आहे. पुराचे पाणी शहरात घुसणार नाही त्याचा फायदा दुष्काळी भागातील १० लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. त्यामुळे चार लाख लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, अशी फडणवीस यांनी शेवटी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.