Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

यंदाच्या हंगामातील आंब्याची पहिली पेटी पुण्यात दाखल, चार डझनसाठी मोजले तब्बल २१०००

7

पुणे: पुण्यात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. तर पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये इतकी आहे. आंबा हे फळ सर्वांचेच आवडते आहे. याला फळांचा राजा म्हणतात. पिकलेला आंबा एप्रिल मध्ये बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. पुणे शहरात या हंगामातील आंब्याची पहिली पेटी आज दाखल झाली या पहिल्या मानाच्या आंब्याच्या पेटीची किंमत २१ हजार रुपये होती.

पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हंगामातील पहिला आंबा दाखल झाला असून त्याची विधीवत पूजा आज पार पडली आहे. यंदा एक महिना आधीच आंब्याची पहिली पेटी मार्केटमध्ये दाखल झाली असून आंब्याला पूरक वातावरण असल्याने आंबा पेटी दाखल झाली आहे. आज विधिवत पूजा करत देवाला पहिला आंबा अर्पण करत पुण्यातील मार्केट यार्डमध्ये पहिल्या पेटीचा लिलाव देखील पार पडला आहे. या लिलावात पहिली मानाची आंब्याची पेटी २१ हजार रुपयांना विकली गेली आहे. बाळासाहेब कुंजीर या फळाच्या व्यापाऱ्याने ही मानाची पेटी विकत घेतली असून या पेटीमध्ये चार डझन आंबे आहेत. पावस भागातील शेतकरी सुनील यांनी मार्केट यार्ड मधील व्यापारी किशोर लडकत यांच्या गाळ्यावर हा रत्नागिरी हापूस आंब्याची पेटी आली.

सामान्यांना परवडणारा आंबा बाजारात येण्यासाठी मार्च महिना उजाडणार

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवगडमधून हापूस आंब्याच्या मोजक्या पेट्यांची आवक सुरू झाली होती. या वर्षीही डिसेंबरपासून आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली होती. ही आवक अशीच होत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने सध्या बाजारात आंबा पाहायलाही मिळत नाही. हीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास मार्चनंतरच हापूस आंब्याची आवक होईल, असे घाऊक व्यापारी सांगत आहेत. सामान्य लोकांना तोपर्यंत आंबा चाखण्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

डिसेंबरमध्ये कोकणातील हापूस आणि मलावी देशातील आंबे बाजारात येत होते. परंतू अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जो काही आंबा येणे अपेक्षित होता, तो आता बाजारात न आल्याने सध्या बाजारात आंबे पाहायला मिळत नाहीत. शिवाय, मध्येच पडणाऱ्या आणि गायब होणाऱ्या थंडीमुळे आंब्याला मोहोर आलेला नाही. आलेला मोहोरही अनेक ठिकाणी गळून गेला आहे. त्यामुळे नवीन मोहोर येऊन फळधारणा होण्यास विलंब लागणार असल्याने यावेळी बाजारात आंबा येण्यासही उशीर होणार आहे. आता १५ मार्चनंतर बाजारात कोकणातील हापूस आंबा येऊ शकेल, असा अंदाज घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी वर्तवला आहे. बदलत्या हवामानामुळे व्यापाऱ्यांचा आंब्याच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. औषध फवारणी, तर नियमित करावी लागते, मात्र अशा परिस्थितीमुळे फवारणी तीन-चार वेळा करावी लागते. त्यामुळे हा देखभालखर्च वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

१५ आंब्यांचा दर ३८००, दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा कोल्हापुरात दाखल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.