
Tej Police Times
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देवगडमधून हापूस आंब्याच्या मोजक्या पेट्यांची आवक सुरू झाली होती. या वर्षीही डिसेंबरपासून आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली होती. ही आवक अशीच होत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने सध्या बाजारात आंबा पाहायलाही मिळत नाही. हीच परिस्थिती यापुढे कायम राहिल्यास मार्चनंतरच हापूस आंब्याची आवक होईल, असे घाऊक व्यापारी सांगत आहेत. सामान्य लोकांना तोपर्यंत आंबा चाखण्यासाठी वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
डिसेंबरमध्ये कोकणातील हापूस आणि मलावी देशातील आंबे बाजारात येत होते. परंतू अवकाळी पावसाने आंब्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जो काही आंबा येणे अपेक्षित होता, तो आता बाजारात न आल्याने सध्या बाजारात आंबे पाहायला मिळत नाहीत. शिवाय, मध्येच पडणाऱ्या आणि गायब होणाऱ्या थंडीमुळे आंब्याला मोहोर आलेला नाही. आलेला मोहोरही अनेक ठिकाणी गळून गेला आहे. त्यामुळे नवीन मोहोर येऊन फळधारणा होण्यास विलंब लागणार असल्याने यावेळी बाजारात आंबा येण्यासही उशीर होणार आहे. आता १५ मार्चनंतर बाजारात कोकणातील हापूस आंबा येऊ शकेल, असा अंदाज घाऊक व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी वर्तवला आहे. बदलत्या हवामानामुळे व्यापाऱ्यांचा आंब्याच्या देखभालीचा खर्च वाढला आहे. औषध फवारणी, तर नियमित करावी लागते, मात्र अशा परिस्थितीमुळे फवारणी तीन-चार वेळा करावी लागते. त्यामुळे हा देखभालखर्च वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
१५ आंब्यांचा दर ३८००, दक्षिण आफ्रिकेतील हापूस आंबा कोल्हापुरात दाखल
Recover your password.
A password will be e-mailed to you.