
Tej Police Times
आरक्षणानंतरच मुंबई सोडण्याचा निर्धार
लातूर : मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणास पाठींबा देण्यासाठी लातूर शहर व जिल्ह्यातून शेकडो वाहनांनी हजारो मराठा समाजबांधव शुक्रवारी रात्री आंतरवाली सराटीला रवाना झाले. उर्वरीत बांधव २३ व २५ जानेवारी रोजी मोठ्या संख्येत ट्रॅक्टर, ट्रक, टेम्पो खासगी व सार्वजनिक वाहनांनी मुंबईस जाणार आहेत. आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असा आम्ही निर्धार केल्याचे त्यांनी सांगितले.
शुक्रवारी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून ते आंतरवाली सराटीस रवाना झाले. शनिवारी पहाटे ते आंतरवाली सराटीला पोहचले. रवाना झालेल्या नागरिकांनी त्यांना महिनाभर पुरेल एवढा शिधा सोबत घेतला आहे. आचारीही सोबत आहेत. आता आरक्षण मिळाल्यानंतरच आम्ही परत येवू असा निर्धार आम्ही केला असल्याचे त्यांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.