
Tej Police Times
भूषण यांनी कराड येथील शासकीय महाविद्यालयातून इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी मिळवली आहे. गेली सात वर्षे ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. एमपीएससी परीक्षेत तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी हे यश मिळवले आहे. यूपीएससी हे त्यांचे ध्येय असून, आजपर्यंत त्यांनी पाचवेळा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
भूषण यांचे मूळ गाव भरतगाव असून, सध्या सातारा येथील विलासपूरमध्ये राहात आहेत. त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण सैनिक स्कूल येथे पूर्ण केल्यानंतर कऱ्हाड येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीई सिव्हिलमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचा संकल्प भूषण यांनी लहानपणीच केल्याने त्या दृष्टीने तयारी करण्यासाठी सुरुवातीला दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा दोन वर्ष अभ्यास केला. त्यानंतर पुणे येथे अभ्यास करण्यास सुरुवात केली. राज्यसेवेच्या २०२२ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेत चांगली रॅक मिळवीत वर्ग एक पदाला भूषण यांनी गवसणी घातली.
श्री रामलल्लाचे विदर्भासोबत आहे ‘हे’ खास नातं, वाचून थक्क व्हाल
भूषण यांचे वडील माणिकराव कदम हे सैन्य दलात सुभेदारपदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. भाऊ शुभम पुणे येथे एमबीएच्या शेवटच्या वर्षात शिकत आहे. भूषण कदम याने मिळविलेल्या यशाचे श्रेय आई – वडील व कुटुंबाला दिला आहे.
वेध लोकसभा निवडणुकीचा : मुसंडी मारण्यासाठी भाजपची तयारी, काँग्रेस सुस्त, वंचित गेमचेंजर, चंद्रपूरमध्ये काय होईल?
विरमाडे येथील विनय अशोक सोनावणे यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. विनय यांचे प्राथमिक शिक्षण विरमाडे, माध्यमिक शिक्षण उडतारे व महाराजा सयाजीराव विद्यालय सातारा येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथे झाले आहे. सध्या स्कील डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून ते प्रशिक्षण घेत आहेत.
रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.