
Tej Police Times
नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते. मात्र यंदा देखील ही गर्दी तारळीच्या वाळवंटात दिसून आली. मागील पाच वर्षाषापासून देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि प्रशासन यांनी यात्रेपूर्वी केलेल्या योग्य नियोजनामुळे तारळी नदीवरील मुख्य पुलावरील गर्दी नियंत्रित राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून आले. सायंकाळी वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक मारुती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.
अयोध्येनंतर नाशिकमध्ये महापूजा, उद्धव-रश्मी ठाकरे दोन्ही मुलांसह काळारामाच्या दर्शनाला
देव मंडपात आल्यानंतर देवाला स्नान घालण्यात आले. देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले. पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटात पार पडला. मिरवणुकीच्या वेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राहावे, म्हणून ठिकठिकाणी चोख बंदोबस्तासाठी बँरिगेटस् उभारले होते. पाल ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे तसेच विविध विभागांचे अधिकारी तळ यात्रास्थळी तळ ठोकून होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.