
Tej Police Times
उद्धवसाहेब वेट अँड वॉच आपली पण वेळ येईल,संजय राऊतांकडून शिवसेना ठाकरे गटाच्या अधिवेशनाची दमदार सुरुवात
प्रभू श्रीरामावर जेव्हा वनवासात जाण्याची वेळ आली त्याकाळी त्याचं घराण भूतलावरील सर्वात मोठं खानदान होतं. तरीही त्याच्या नशीबी वनवास आला. राम वनवासाच्या दिशेने प्रवासाला निघाला तेव्हा वाटेत अनेक राज्यं होती. मात्र, रामाने कोणताही राजा, वतनदार, सरंजामदार यापैकी कोणाचीही मदत घेतली नाही. राम आपल्यासोबत सामान्य माणूस, वंचित, वानरं, माकडं, आदिवासी, ओबीसी, क्षत्रिय अशा सर्वांना घेऊन पुढे गेला. अन्यायाविरुद्ध लढण्याचा रामाचा निर्धार पक्का होता. रामाने धनिकांच्या मदतीने नव्हे तर सामान्य लोक आणि शूर योद्ध्यांच्या ताकदीवर लढाई लढली, असे संजय राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी आपल्या भाषणात सर्व शिवसैनिक म्हणजे हनुमान असल्याचे सांगितले. हनुमानाने रामायणात जशी महत्त्वाची भूमिका पार पाडली, तशीच भूमिका आपल्याला पार पाडायची आहे. तसेच भाजप हा पक्ष अजिंक्य नाही, हेदेखील राऊतांनी ठणकावून सांगितले. रावण हा अजिंक्य नव्हता, त्याला बालीने हरवले होते. बालीने रावणाला बगलेत पकडून त्याची धिंड काढली होती. त्यामुळे रावण अजिंक्य होता, हे डोक्यातून काढून टाका. सध्याचा ‘रावण’ही अजिंक्य नाही. हनुमान लंकेत गेला तेव्हा रावणाच्या सैनिकांनी त्याला अटक केली. हनुमानाला दरबारात आणण्यात आले तेव्हा, रावणाने त्याला विचारले, ‘काय रे वानरा, मला ओळखत नाहीस?’ तेव्हा हनुमान म्हणाला की, ‘हो मी तुला ओळखतो, तू तोच ना ज्याची बालीने बगलेत पकडून धिंड काढली’. हनुमानाचं हे वाक्य ऐकून रावणाचा चेहरा पडला. हनुमानाने भर दरबारात रावणाला हे सांगितलं कारण, त्याल रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता. लढाईत पहिले शत्रूचा आत्मविश्वास डळमळीत केला पाहिजे. अरे कोण भाजप, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ मिंदे?, असे संजय राऊत यांनी म्हटले. राऊतांनी हे वाक्य उच्चारताच सभागृहातील शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता.
हनुमानाने पहिल्याच भेटीत रावणाचा आत्मविश्वास तोडला, त्यामुळे तो रामाकडून पराभूत झाला. इथे बसलेले आपण सगळे शिवसैनिक म्हणजे हनुमान आहोत. राम हा उत्तम नेता होता. त्याने सुग्रीवासारख्या सामान्य वानराला नेता केले. रामाने हनुमानाला लंकेत जाऊन सीतेची ख्यालीखुशाली विचारायला सांगितली होती आणी मी येतोय, असा संदेश पाठवला होता. पण त्यापुढच्या सगळ्या घडामोडी हनुमानाने स्वत:च्या हिंमतीवर केल्या. राम आणि हनुमानामध्ये लंकेला जाण्यापूर्वी फक्त थोडासाच संवाद झाला होता. हनुमान दिलेली कामगिरी पार पाडेल, यावर रामाचा विश्वास होता. रामाप्रमाणे आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला पाहिजे. आपले कार्यकर्ते इकडची दुनिया तिकडे करु शकतात, हा विश्वास ठेवा. मग लंकेला आग लावायला किती वेळ लागतो? उद्धवजी, लंका जाळण्यासाठी आम्हाला तुमच्या आदेशाचीही गरज नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.