
Tej Police Times
मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान
पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार
प्रतितास ८० किमी वेगाने वाहन चालवण्याची परवानगी
वाहनचालकांवर १००हून अधिक सीसीटीव्हींची नजर
बोगद्यात वायुविजन प्रणाली
बोगद्यामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. यामध्ये अग्निरोधक फायर बोर्ड तसेच बोगद्यांमध्ये वायुविजन प्रणाली आहे. त्यामुळे वायुविजनचा आणि हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी मदत करण्यात येणार आहे. एका बोगद्यात आग लागली तरीही दुसरा बोगदा धूरमुक्त राहील. १०० मेगावॅट तीव्रतेच्या आगीत किमान तीन तास तग धरू शकेल, अशा पद्धतीने या बांधकामाची संपूर्ण रचना आहे. आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास बचावासाठी ३०० मीटरवर ११ छेद बोगदेही तयार केले आहेत.
तूर्त टोल नाही
मुंबई सागरी किनारा मार्गाचा पहिला टप्पा फेब्रुवारी खुला केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आचारसंहिता लागण्याआधीच पहिला टप्पा सुरू करण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. पहिल्या टप्प्यात टोल असणार की नाही, असा प्रश्न असतानाच कोणताही टोल आकारला जाणार नसल्याचे सागरी किनारा रस्ता प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मंतय्या स्वामी यांनी दिली.
शिवडी न्हावा शेवाला जोड
एमएमआरडीएकडून वरळी-शिवडी जोडरस्ता बांधण्यात येत आहे. हा जोडरस्ता झाल्यानंतर वरळीपासून सागरी किनारा मार्गाला अंडरपास करून जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे नवी मुंबईतून शिवडी न्हावा शेवामार्गे येऊन पुढे सागरी किनारा मार्गावरूनही जाता येणार असल्याची माहिती पालिकेने दिली.
महायुती सरकारकडून ओबीसी मंत्र्याची अवहेलना, भुजबळांना ध्वजारोहणाचा मान का नाही? : वडेट्टीवार
Recover your password.
A password will be e-mailed to you.