
Tej Police Times
किरीट सोमय्या मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पत्रकारांनी त्यांना शिवसेनेच्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना करत असलेली ही घोषणा राज्यातील घडामोडींवरुन लक्ष्य विचलीत व्हावे यासाठीच केली जात आहे. यापूर्वी शिवसेने बिहारमध्ये निवडणूक लढवली होती, त्यावेळी काय झाले? तेथे शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझीटच जप्त झाले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या काही उमेदवारांना तर १०० मतेही पडलेली नव्हती, असे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या इज्जतीचा लिलाव करण्याची हौस आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे.
क्लिक करा आणि वाचा- शरद पवार यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे: बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
सोमय्या यांनी परिवहन मंत्री अनील परब यांच्यावर लोकायुक्तांनी केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. अनिल परब यांचे कार्यालय तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती देतानाच ठाकरे सरकारने न्यायालयामध्ये लोकायुक्तांसमोर अनिल परब याच्या कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याची माहिती दिली आहे असे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी त्यांना शिवसेना उत्तर प्रदेशातील निवडणूक लढवणार असल्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.
क्लिक करा आणि वाचा- मुंबई, पुण्यापाठोपाठ उल्हासनगरही हादरले; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार
क्लिक करा आणि वाचा- मैत्रिणीच्या सांगण्यावरून मित्रांनी घातला दरोडा; वृद्ध महिला डॉक्टरला लुटणाऱ्या पाच जणांना अटक
Recover your password.
A password will be e-mailed to you.