Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘लापता लेडीज’चा धुमाकूळ, कमी बजेटच्या सिनेमानं दोन दिवसांत कमावले तब्बल इतके कोटी

7

मुंबई: किरण राव हिनं दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला.कॉमेडी ड्रामा असलेल्या या सिनेमाचं पहिल्या दोन दिवसांत प्रेक्षकांची प्रचंड कौतुक केलंय. तर पहिल्या दो दिवसांत सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली आहे.

पहिल्या दिवशी ‘लापता लेडीज’ सिनेमानं ७० लाखांची कमाई केली होती. पहिल्या दिवशी वर्किंग डे असतानाही शुक्रवारी सिनेमानं ७० लाखांचा आकडा पार केला. तर दुसऱ्या दिवशी सिनेमानं तब्बल १.३४ कोटींची कमाई केली आहे. तर दोन दिवसांत सिनेमानं दोन कोटींचा गल्ला जमवला आहे. येत्या दिवसांत माउथ पब्लिसिटीचा फायदा सिनेमाला होईल, असं म्हटलं जात आहे.

बॉलिवूडचे तीन खान एकत्र थिरकले, तर शाहरुखचा ‘जय श्रीराम’चा नारा; तो VIDEO व्हायरल
बजेट किती ?
३००-४०० कोटींचे सिनेमे बनत असताना लापता लेडीज मात्र पाच ते सहा कोटींमध्ये तयार झालेला सिनेमा आहे . अभिनेता आमिर खान याच्या निर्मिती संस्थेनं या सिनेमाची निर्मिती केली आहे. पाच ते सहा कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाच्या कमाईचे हे आकडे समाधानकारक आहेत. प्रेक्षकांसोबतच समिक्षकांनी देखील सिनेमाचं कौतुक केलंय. कोणताही मोठा स्टार नसताना एक चांगला सिनेमा पाहिल्याचं अनेकांनी म्हटलंय. सोशल मीडियावर देखील सिनेमाचं आणि किरण राव हिचं कौतुक होताना दिसत आहे.

१५ वर्षांच्या संसारानंतर आमिर खान- किरण राव यांचा घटस्फोट


किरण राव हिच या सिनेमाची हिरोईन असल्याचं अनेकांनी तिचं कौतुक करताना म्हटलंय. गेल्या काही महिन्यांपासून किरण राव या सिनेमाचं प्रमोशन करत होती. हा सिनेमा तिच्यासाठी बऱ्या अर्थांनी खास असल्याचं तिनं म्हटलं.
दादा कोंडकेंचा शब्द, मंत्र्यांचा दबाव आणि… अभिनेत्री उषा नाईक यांनी सांगितलं पुरस्कारांचं राजकारण

काय आहे लापता लेडीज सिनेमाची कथा?
हा चित्रपट दोन नवविवाहीत वधूंच्या अवतीभवती फिरतो. फुलकुमारी म्हणजेच नितांशी गोयल आणि पुष्पा म्हणजे प्रतिभा रत्नाया… दोन नवविवाहीत वधू रेल्वे प्रवासात अचानक गायब होतात. त्यानंतर काय गोंधळ घडतो, याची ही साधी गोष्ट आहे.२००१मध्ये देशाच्या ग्रामीण भागात घडणारी ही गोष्ट मांडताना किरण राव हिनं कथासूत्र, काळाचे संदर्भ आणि पटकथेचे धागे घट्ट विणले जातील, याची खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.