Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

उदंड जाहले कैदी, तिहार हाऊसफुल्ल

10

म.टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : आशियातील सर्वांत मोठा तुरूंग, अशी ओळख असलेल्या दिल्लीतील तिहार तुरूंगात शुक्रवारी आणखी एका तरूण कैद्याची हत्या झाल्यावर येथील व्हीआयपींच्या सुरक्षेचा व या तुरूंगात क्षमतेपेक्षा हजारो कैद्यांची गर्दी झाल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. देशभरातील तुरूंगात अशीच परिस्थिती आहे. उदंड जाहले कैदी, या स्थितीतही गुन्हा सिद्ध झालेल्यांपेक्षा कच्च्या कैद्यांची संख्या कितीतरी जास्त असते हेही वास्तव आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, बीआरएस नेत्या के कविता आदी नेते व काही महत्वाचे लोकही सध्या तिहार मुक्कामी आहेत. तिहारमध्ये क्र १ ते ९ असे मोठे तुरूंग आहेत. व्हीआयपी कैद्यांना वेगळ्या तुरूंगात ठेवले जात असले तरी गजाआड भर दिवसा खून होण्याच्या घटनांमुळे त्यांच्याही सुरक्षेबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत.
खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या दीपक याची मूळचा अफगाणिस्तानचा असलेला अब्दुल बशीर या कैद्याने त्याच्यावर हल्ला करून दिवसाढवळ्या त्याचा खून केला. गेल्या वर्षी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गुंड प्रिन्स तेवतिया उर्फ टिल्लू ताजपुरिया याची तिहार तुरुंगातच हत्या करण्यात आली होती.

तिहार कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा पाचपट अधिक कैदी आहेत. कैद्यांना आंघोळ करण्यासाठी आणि शौचालयात जाण्यासाठीही रांगेत उभे राहावे लागते व त्यातून भांडणे होतात. कैद्यांना झोपायलाही जागा मिळत नाही. दिल्लीतील रोहिणी आणि मंडोली कारागृहांतही हीच स्थिती आहे.

तिहारमधील एका तुरुंगात कैद्यांना ठेवण्याची क्षमता साडेसातशेच्या आसपास आहे. मात्र एकेका कारागृहात साडेतीन हजारांपेक्षा जास्त कैदी आहेत. ही संख्या तुरूंगाच्या क्षमतेच्या पाचपटीने जास्त आहे. कोरोना काळात अंतरिम जामीन आणि पॅरोलवर सुटलेले ४००० हून अधिक कैदीही लवकरच आत्मसमर्पण करतील तेव्हा तिहारमधील गर्दी आणखी वाढून परिस्थिती दयनीय होईल असे अधिकाऱ्यांचे मत आहे. तिहारचे निवृत्त महासंचालक संदीप गोयल यांनी येथील कैद्यांची बहुसंख्या व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत केंद्राला पत्र लिहिले होते. तिहारमध्ये एकूण १४,८०० कैदी आहेत व कायम कर्मचारी फक्त १९०० व प्रतीनियुक्तीवरील ९७३. अजूनही किमान ९४४ पदे रिक्त आहेत. तिहारमधील कर्मचारीसंख्या किमान ६२५० करण्याचा निर्णय केंद्राने घेतला तरी पदे भरण्याच्या नावाने चांगभलंच आहे. २०१० मध्ये सरकारने ३ कैद्यांमागे एक रक्षक असे प्रमाण निश्चित केलेले असताना सध्या सरासरी १५-२० कैद्यांमागे एक रक्षक असतो.

तिहार, रोहिणी आणि मंडोली तुरुंगांची मिळून क्षमता १० हजार २६ कैद्यांची असताना प्रत्यक्षात दुप्पट म्हणजे २० हजाराच्या आसपास कैदी येथे आहेत. त्यातील सुमारे २००० कैदी टोळ्यांतील बदमाश व घातक गुंड, खुनी वगैरे आहेत.

देशातील परिस्थिती (डिसेंबर २०२० पर्यंत)

एकूण तुरूंग- किमान १३०६

(१४५ मध्यवर्ती कारागृहे, ४१३ जिल्हा कारागृहे, ५६५ उप कारागृहे, ८८ खुले व ४४ विशेष तुरुंग, फक्त महिलांसाठी -१९, बोर्स्टल शाळा २९ आणि ३ इतर तुरुंग)
या कारागृहांची सरासरी क्षमता – ४ लाख १४ हजार कैदी.
प्रत्यक्षात गजाआड असलेले – ४ लाख ८८ हजार ५११.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.