
Tej Police Times
कपिल पाटील पुढे म्हणाले, “बाळ्यामामा यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांची फसवणूक, धमक्या देण्याबाबत अनेक गुन्हे दाखल होते. त्यांनी गोदामांच्या व्यवहारातही गरीब शेतकऱ्यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. अवघ्या १० वर्षांत त्यांच्यावरील सर्वच्या सर्व गुन्हे रद्द झाल्याचा चमत्कार झाल्यामुळे जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंतच्या प्रचारात ते स्वत:च्या राजकीय कारकीर्दीत स्वत: केलेले एकही काम जनतेला सांगू शकले नाहीत.”
दरम्यान, भिवंडीची ही निवडणूक गोदामांच्या राजकारणावरुन चांगलीच चर्चेत आलीय. बाळ्यामामांनी अनेकदा पक्ष बदललेला असतानाही त्यांना ऐनवेळी तिकीट मिळाल्यामुळे या मतदारसंघात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. कपिल पाटलांनीही याच मुद्द्याला हात घातलाय आणि बाळ्यामामांवर प्रहार केला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.