Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजप आणि एनडीएमध्ये अस्वस्थता, महागाईने हैराण झालेल्या लोकांना बदल हवाय – सचिन पायलट

9

नवी दिल्ली: लोकसभेची २०२४ ची निवडणूक ही परिवर्तनाची निवडणूक म्हणून इतिहासात नोंदवली जाईल, असा विश्वास काँग्रेसचे स्टार प्रचारक सचिन पायलट यांनी सोमवारी व्यक्त केला. पायलट यांनी दिल्लीतील टाइम्स कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. यंदाच्या निवडणुकीचा कल काय आहे? देशभरातील वातावरण कसे आहे? आदी प्रश्नांना त्यांनी विस्ताराने उत्तरे दिली….प्रश्न- ४ जून हा दिवस कसा असणार ?
आम्ही यंदा निवडणूक जिंकण्यासाठीच लढत आहेत आणि जिंकू. मी आतापर्यंतच्या टपप्यांमध्ये जे चित्र पाहिले ते काँग्रेससाठी सकारात्मक आहे. जनतेत एक अंडरकरंट आहे, लोक बदलासाठी मतदानाला जात आहेत. भाजप सरकारचा उद्दामपणा लोकांना आवडलेला नाही. आवडत नाही. भाजप आणि एनडीएमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. महागाई, बेरोजगारीने हैराण झालेल्या लोकांना बदल हवा आहे. आम्हाला (काँग्रेससह इंडिया) नवे सरकार बनवायची जबाबदारी देशातील जनता देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Loksabha Election च्या पाचव्या टप्प्यात देशात ५७ % मतदान; महाराष्ट्र सर्वात पिछाडीवर, वाचा संपूर्ण आकडेवारी एका क्लिकवर
प्रश्न- यंदाची निवडणूक वेगळी कशी ?
पायलट- ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार आहे तिथे जोरदार अँटी इन्कम्बन्सी तयार झाली आहे. अनेक पक्ष लढत असले तरी केवळ काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीच चर्चा होत आहे. अग्निवीर योजना रद्द करणार, महिलांना व गरीबांना आर्थिक मदत, जुन्या योजनांचे पुनरुज्जीवन, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, प्रत्येक गरीब कुटुंबाला १ लाख रुपयांची आर्थिक मदत हे मुद्दे असलेला आमचा जाहीरनामा जनतेला आवडला म्हणूनच तर भाजपला पुन्हा धार्मिक मुद्यांकडे वळावे लागले. आज लोकशाही व राज्यघटना वचविणे हे पहिले आव्हान आहे.

प्रश्न- राज्यघटना बदलण्याच्या आरोपावर भाजपचा पलटवार असा आहे की, काँग्रेसनेच घटनादुरुस्ती अधिक वेळा केली.
पायलट- मुळात त्यांना ही चर्चा का सुरू करावी लागली? काँग्रेसने असे कधीच केले नाही. तुम्ही राज्यघटना बदलणार नाही तर त्याचे वारंवार खंडन करण्याची भाजपला गरज का वाटली? राजीव गांधी यांचेही ४०० च्या वर खासदार होते पण तेव्हा ते आरक्षण संपवून राज्यघटना बदलतील अशी भीती कोणीही व्यक्त केली नाही. यावर भाजप पुन्हा पुन्हा खुलासे करत आहे.

प्रश्न- यंदाच्या निवडणुकीपूर्वीच काही उमेदवारांनी माघार घेतली….
पायलट- निवडणुकाच होऊ नयेत हे लोकशाहीत अजिबात योग्य नाही. या माघारी हेच दाखवतात की तुम्हाला आत्मविश्वास नाही. त्यामुळे असुरक्षितता आहे. निवडणुकीच्या काळात खाती गोठवणे, सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे, आवाज दाबणे भारतातील लोकांना अजिबात आवडत नाही. जिंकणे किंवा हरणे वेगळे, निवडणुका होऊ न देणे हे एकतर कट आहे किंवा ते असुरक्षिततेचे दर्शक आहे.

प्रश्न- भाजप म्हणतो की काँग्रेसनेच घटनादुरुस्ती अधिक केली आहे.
उत्तर: सरकार आणि सत्तेचे वातावरण आहे, तिथूनच घटनाबदलाचा पहिला आवाज उठला आहे. त्यामुळेच बड्या नेत्यांना सतत इन्कार करावा लागत आहे. घटनाबदलाचा आरोपच खोटा आहे तर त्याचे वारंवार खंडन करण्याची भाजपला गरज का वाटली? राजीव गांधी यांचेही ४०० हून जास्त खासदार होते. पण म्हणून ते राज्यघटना बदलतील अशी भीती तेव्हा कोणीच व्यक्त केली नव्हती.

प्रश्न- यंदा निवडणुकीपूर्वीच काही उमेदवारांनी माघार घेतली….
निवडणुका होऊ नयेत हे योग्य नाही, याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे असुरक्षित. लोकशाहीत जय-पराजय असतो. केवळ मत देणे म्हणजे लोकशाही नाही. प्रबळ विरोधी पक्ष, भक्कम संस्था असाव्यात. रशियाप्रमाणेच पाकिस्तानातही मतदान होते, त्यामुळे त्याला तिथली मजबूत लोकशाही म्हणता येईल का? जिंकणे किंवा हरणे वेगळे. पण निवडणुका होऊ न देणे हे एकतर कट आहे किंवा असुरक्षितता दाखवते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.