
Tej Police Times
‘दहशतवादाचा हा आश्रयदाता एकेकाळी आपल्याला घाबरवत होता, आता तिथल्या लोकांना साधे अन्नधान्य मिळवणेही कठीण झाले आहे. पाकिस्तान संपला आहे, मात्र त्यांचे सहानुभूतीदार असलेले सपा आणि काँग्रेस देशाला घाबरवण्यात व्यग्र आहेत,’ अशी टीका त्यांनी केली. ‘ते म्हणतात, आपण पाकिस्तानला घाबरले पाहिजे कारण त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. त्यांना माहीत नाही का, की ५६ इंची छाती काय असते. हे कमजोर काँग्रेस सरकार नाही, परंतु सशक्त मोदी सरकार आहे,’ असे त्यांनी बजावले. बस्ती येथे हरिश द्विवेदी भाजपचे उमेदवार आहेत.
आणीबाणी घोषित झाली, त्या धक्क्याने माझी आई गेली, लोकशाहीचा गळा घोटला तो…. राजनाथ सिंहांचा काँग्रेसवर घणाघात
‘हे लोक सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करतात. काँग्रेसच्या शहजाद्याला सर्वोच्च न्यायालयाचा राम मंदिराचा निर्णय बदलायचा आहे. त्यांना पुन्हा बाबरीचे कुलूप राम मंदिराला लावायचे आहे आणि रामलल्लाला पुन्हा तंबूत पाठवायचे आहे,’ असा आरोपही मोदी यांनी केला. तर, दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिरावून घेऊन जे व्होट जिहाद करतात, त्यांना ते द्यायचे आहे,’ असेही मोदी म्हणाले.
कांथी (प. बंगाल) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर मतपेढीच्या राजकारणासाठी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याचा व घुसखोरांना राज्याचे लोकसंख्याशास्त्र बदलण्याची परवानगी देण्याचे पाप केल्याचा आरोप केला. राज्यात भाजपने ३० लोकसभा जागा जिंकल्यावर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडून बॅनर्जी सरकारला निरोप दिला जाईल, असा दावाही शहा यांनी प्रचारसभेदरम्यान केला. ‘घुसखोरांमुळे राज्याचे लोकसंख्याशास्त्र बदलू लागले असून त्याचा परिणाम केवळ बंगालवरच नव्हे तर संपूर्ण देशावर होत आहे. हे घुसखोर ममतांची मतपेढी आहेत आणि त्यांनाच खूष करण्यासाठी त्या सीएएला विरोध करत आहेत,’ असा आरोपही शहा यांनी केला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.