Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shree Swami Samarth : अशक्य ही शक्य करतील स्वामी! संकंटावर मात करण्यासाठी स्वामींच्या तारक मंत्राचे करा पठण, दु:ख होतील दूर

9

स्वामी समर्थ तारक मंत्र :

हिंदू पंचागात प्रत्येक वाराला विशेष असे महत्त्व आहे. त्यानुसार तो प्रत्येक देवाला अर्पण केला जातो. गुरुवार हा दिवस दत्तगुरु आणि स्वामी समर्थांना अर्पण केला आहे. असे म्हटले जाते की, या दिवशी स्वामी समर्थांचे व्रत आणि पूजा केल्याने अनेक दु:ख दूर होतात.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असे आश्वासन स्वामी आपल्या भक्तांना नेहमी देत असतात. कोणत्याही कठीण प्रसंगात स्वामींची आठवण केल्यास ते आपल्याला अनेक संकंटातून बाहेर पडण्यास मार्ग दाखवतात. स्वामींचे नाव घेतल्याने नवीन ऊर्जा प्राप्त होते. तसेच नैराश्य आणि चिंता गळून पडते.
Devi Lakshmi Favourite Zodiac : या लोकांवर असते लक्ष्मी देवीची विशेष कृपा, कधीच भासत नाही पैशांची चणचण
लाखो घरांमध्ये आजही समर्थांचे नाव घेतले जाते. ज्यातून आत्मविश्वास आणि नवचैतन्य प्राप्त होते. याबाबत लाखो भाविकांचा अनुभव आहे. दर गुरुवारी अनेक घरात स्वामी समर्थांचे पूजन, भजन आणि नामस्मरण केले जाते. तसेच अनेक भाविक या दिवशी स्वामींच्या मठातही जातात. स्वामींचा अखंड नामजप केल्याने स्मरणशक्ती वाढते, जगण्याचे बळ मिळते तसेच संकंटावर मात करण्यासही मदत होते.

स्वामी म्हणतात की, माणूस कशालाच घाबरु शकत नाही. तो घाबरतो आपल्या वाईट कर्मांना. आपण केलेल्या चुकीच्या कृतीमुळे आपल्या आयुष्यात संकंटे येतात. ज्यामुळे आपण अडचणीत सापडतो. कोणतीही गोष्ट करताना संयम अधिक महत्त्वाचा आहे. संयम ठेवल्याने अनेक गोष्टी, दु:ख सहज दूर होतात.

तुमच्या दु:खावर मात करायची असेल तर स्वामींचा तारक मंत्र हा प्रभावी मार्ग आहे. तारक म्हणजे तारुन नेणारा, अनेक दु:ख दूर करणारा. या तारक मंत्राने तुम्हाला अनेक संकंटातून बाहेर पडण्यास मदत होईल. हा मंत्र म्हटल्याने चिंता, वेदना आणि नैराश्य दूर होईल. तुमच्या मनात सकारात्मकतेची भावना निर्माण होईल. दु:ख दूर करण्यासाठी आणि जीवन चांगले जगण्यासाठी स्वामींच्या या तारक मंत्रांचे करा पठण
Mantra For Children : सुट्टीत शिकवा मुलांना हे श्लोक, ज्ञान-बुद्धिसोबत वाढेल एकाग्रता; असे करा पाठ
नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय ।
स्वये भक्त – प्रारब्ध घडवी ही माय ।।
आज्ञेविना काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भीती तयाला
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळू दे ।
वसे अंतरी स्वामीशक्ती कळू दे ।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू । स्वामी देतील साथ
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूती नमन नाम ध्यानार्दी तीर्थ ।
स्वामीच या पंचमृतात ।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीती,
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।५।।

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.