
Tej Police Times
शेतकरी आंदोलनामुळे तापलेल्या लखीमपूर खेरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देशातील केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तसंच, महाराष्ट्र भाजपवरही अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.
‘लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवले. त्या मंत्रीपुत्रास वाचवण्याचे प्रयत्न योगींच्या पोलिसांनी केले. तो मी नव्हेच, मी तेथे नव्हतोच, असा आव मंत्रीपुत्राने आणला. पण आता शेतकऱ्यांवर घुसवलेल्या गाडीचा व्हिडिओच समोर आला. त्यामुळं सरकार काय करणार?, असा सवाल करतानाच. हे प्रकरण पश्चिम बंगला, महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ, केरळात घडले असते तर त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने देशभर आंदोलन पुकारले असते,’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं केली आहे.
वाचाः राहुल गांधींना लखीमपूरला जाण्यास योगी सरकारने परवानगी नाकारली
‘लखीमपूर खेरीत जाण्यापासून छत्तीसगढ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनाही योगी सरकारने रोखले आहे. हे काय हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध सुरु आहे काय? आपल्याच देशातील दोन मुख्यमंत्र्यांना लखनौत उतरण्यापासून रोखले जाते. हा संघराज्यातील एक विचित्र प्रकार घडला आहे. लोकशाहीचा असा गळा आणीबाणीच्या काळातही कधी घोटला नव्हता. आज जे घडले आहे ते भयंकर आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
‘शेतकऱ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अमूल्य योगदान दिले. सरदार पटेलांच्या नेतृत्वाखाली ‘बार्डोलीचा सत्याग्रह’ का केला, हे शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. गांधीजींनी मिठापासून परदेशी कपड्यांपर्यंत केलेली आंदोलने शेतकऱ्यांच्याच बलिदानाने यशस्वी झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेतकऱ्यांचीच पोरे शहीद झाली व आज देशाच्या सीमेवरही शेतकऱ्यांचीच पोरे मरत आहेत. त्या जवानांच्या कुटुंबांवर भरधाव गाड्या घालून मारण्याचे पाप सरकार करीत असेल तर ‘देश खतरे में है!’ असे मानावेच लागेल,’ अशी टीका शिवसेनेने केली आहे.
वाचाः इंग्रजांना घालवले तसे भाजप सरकारलाही घालवायचे आहे: नाना पटोले
अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
Recover your password.
A password will be e-mailed to you.