
Tej Police Times
१ जून रोजी होणाऱ्या या बैठकीमागे ‘केजरीवाल फॅक्टर’ हा एक महत्वाचा घटक असल्याचे बोलले जात आहे. दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले अरविंद केजरीवाल हे न्यायालयाकडून निवडणुकीकरता मिळालेल्या जामीनावर बाहेर आहेत. त्यांचा जामीन हा १ जून रोजी समाप्त होत आहे. तसेच १ जून रोजी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्ष आणि इंडिया आघाडी यांच्यामध्ये कुठे आघाडी आहे तर कुठे हे पक्ष वेगळे लढत असल्याची परिस्थिती आहे. नुकताच जामीनाचा कालावधी वाढविण्यासाठी केजरीवाल यांनी केलेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
लोकसभा निवडणुकांचा निकाल हा ४ जून रोजी जाहिर होत आहे. यामध्ये निकालानंतर जर सरकार स्थापन करायची वेळ आल्यास त्यासाठीची पुर्वतयारीसाठी कॉंग्रेसला तयार रहायचे आहे. इंडिया आघाडीध्ये समाविष्ट पक्षांना जर बहुमतासाठी आवश्यक जागा न मिळाल्यास सरकार स्थापन करण्यासाठी नव्या सहकारी घटकपक्षांची गरज भासू शकते, तेव्हा या बैठकीमध्ये या संभाव्य पक्षांना सोबत घेण्याबाबतही चर्चा होऊ शकते.
बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यानंतरच इंडिया आघाडीची सुत्रे कॉंग्रेसने आपल्या हातात घेतली होती. आता लोकसभेच्या निवडणूका अंतिम टप्प्यात आल्या असताना सर्व घटकपक्षांना खर्गेंकडून निमंत्रण पाठवत कॉंग्रेसने एकप्रकारे आघाडीची सुत्रेच आपल्या हातामध्ये घेतली आहेत.
इंडिया आघाडी स्थापन झाल्यापासून आघाडीतील घटकपक्षांत ताळमेळ दिसत नव्हता. यावरुन सत्ताधारी भाजपकडून विरोधाभास असलेल्या पक्षांनी एकत्र येत आघाडी बनविल्याची टिका केली जात होती. दुसरीकडे केरळमधील डाव्यांनी आघाडीपासून फारकत घेतली. ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये ‘एकला चलो’ ची भूमिका घेतली आहे. पंजाबमध्ये केजरीवाल तर जम्मू कश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती या स्वतंत्र लढत आहेत. या सर्वांमधून आघाडीमध्ये दिसून येणारा विस्कळीतपणा नाहीसा करुन त्यांना एकत्र आणणे ही रणनीती या बैठकीमागे असू शकते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.