
Tej Police Times
Renuka Dhaybar | Maharashtra Times | Updated: Oct 7, 2021, 4:16 PM
Weather Alert : राज्यासाठी पुढचे ४ तास महत्त्वाचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
कालच्या या मुसळधार पावसानंतर आज पुन्हा एकदा अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी ३०-४० किमी/ताशी वेगाने वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र पाऊस पडेल. कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, पालघरमध्ये पुढील ३-४ तासात पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहेत. त्यामुळे नागरिकांनी बाहेर जाताना खबरदारी घ्यावी अशी माहिती आयएमडी मुंबईकडून देण्यात आली आहे.
पिकअप गाडीला मोठा अपघात; ५० फूट खोल दरीत कोसळली, एक ठार
परतीच्या पावसाला सुरुवात
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आज ६ ऑक्टोबर पासून राजस्थान आणि गुजरातच्या काही भागातून सुरुवात झाली आहे. गुजरातच्या काही भागातून, पूर्ण राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशचा काही भाग असा भाग परतीच्या पावसासाठी पुढील २४ तास अनुकूल असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.