
Tej Police Times
‘मनमोहन सिंग यांनी त्यांच्या एका वक्तव्यात म्हटले होते की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे’, असा दावा पंतप्रधान मोदींनी प्रचारादरम्यान केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना डॉ. सिंग यांनी मोदींच्या प्रचारातील ‘कमालीच्या द्वेषपूर्ण’ भाषणांचा उच्चार केला आहे.
लोकसभेत भाजपच्या स्वबळावर ३७० जागा, कोठून आला हा नंबर; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सांगितले
२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या वचनाचे उदाहरण घेऊन डॉ. सिंग यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या धोरणांमुळे गेल्या १० वर्षांत शेतकऱ्यांची कमाईच नष्ट झाली आहे. आज शेतकऱ्यांचे दैनंदिन राष्ट्रीय सरासरी मासिक उत्पन्न केवळ २७ रुपये आहे. प्रत्येक शेतकऱ्यावर सरासरी २७ हजार रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. इंधन शेतीशी संबंधित उपकरणांवर जीएसटी तसेच कृषी निर्यात आणि आयातीवरील मनमानी निर्णयांमुळे शेतकरी कुटुंबांची परिस्थिती हलाखीची झाली आहे.
Narendra Modi: भारताची प्रतिष्ठा जगभरात वाढली, गेल्या १० वर्षाच्या कारकिर्दीबाबत मोदींचा दावा
याच पत्रात डॉ. सिंग म्हणतात की देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या १० वर्षांत अकल्पनीय उलथापालथ झाली आहे. कोविड-१९ महामारी बरोबरच नोटाबंदी, जीएसटी आणि वित्तीय गैरव्यवस्थापनाचीही आपत्ती सरकारने आणली त्यामुळे ही दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे.
Narendra Modi : महाविनाश आघाडीतील NCP ला कुटुंब पुढे न्यायचंय, म्हणून काँग्रेसमध्ये विलिनीकरण, मोदींचा प्रहार
दिल्लीच्या सीमांवर २०२०-२१ मध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून मोदी सरकारवर टीका करताना डॉ. सिंग यांनी म्हटले आहे की, बहुतेक पंजाबमधील शेतकऱ्यांसह सुमारे साडेसातशे शेतकरी दिल्लीच्या सीमेवर अनेक महिने झालेल्या आंदोलनात असताना मरण पावले. त्यांनी आंदोलन मागे घ्यावे यासाठी लाठ्या आणि रबराच्या गोळ्या पुरेशा नव्हत्या तर पंतप्रधानांनी संसदेत आमच्या शेतकऱ्यांना ‘आंदोलक’ आणि ‘परजीवी’ म्हणत हीन भाषेत हल्ला चढवला. शेतकऱ्यांशी सल्लामसलत न करता त्यांच्यावर लादलेले तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, ही एकच मागणी या शेतकऱ्यांनी केली होती.
मनमोहन सिंग पुढे लिहितात, गेल्या दहा वर्षांत भाजप सरकारने पंजाब, पंजाबी आणि पंजाबियत यांना बदनाम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. काही चुकीच्या विधानांसाठी मोदींनी मलाही जबाबदार धरले आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही एका समाजाला दुसऱ्या समाजापासून वेगळे केले नाही. हे करण्याचा कॉपीराइट फक्त भाजपकडे आहे, असा टोमणा मारताना डॉ. सिंग यांनी आपली राज्यघटना आणि लोकशाहीला निरंकुश सरकारपासून वाचवण्याची ही शेवटची संधी आहे, असा इशारा दिला आहे.
विख्यात कवी अल्लामा इक्बाल यांच्या एका प्रसिद्ध काव्यपंक्तीचा दाखला देऊन डॉ. सिंग यांनी पत्राचा शेवट केला. त्यांनी लिहिले की, फिर उठी आखिर सदा तौहीद की पंजाब से, मर्द-ए-कामिल ने जगाया हिंद को फिर ख्वाब से।
Recover your password.
A password will be e-mailed to you.