Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिल्ली-व्हॅनकुवर विमानाची २२ तास रखडपट्टी, एअर इंडियाच्या लांब पल्ल्याच्या विमानाला पुन्हा विलंब

8

नवी दिल्ली: एअर इंडियाच्या नवी दिल्ली ते व्हॅनकुवर (कॅनडा) विमानाची तांत्रिक कारणामुळे तब्बल २२ तास विमानतळावर रखडपट्टी झाली. अखेर रविवारी पहाटे ३.१५ वाजता या विमानाने उड्डाण केले. ‘एअर इंडियाचे दिल्ली-व्हॅनकुवर हे विमान नियोजित वेळेनुसार शनिवारी पहाटे ५.३० वाजता उड्डाण करणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे विमान कंपनीला या उड्डाणाची वेळ बदलावी लागली. हे विमान अखेर रविवारी पहाटे ३.१५ वाजता रवाना झाले,’ अशी माहिती सूत्रांनी दिली.‘एआय १८५ या विमानाला प्रथम तांत्रिक कारणामुळे आणि त्यानंतर विमान कर्मचाऱ्यांसाठी सक्तीच्या असलेल्या उड्डाण कर्तव्य वेळ मर्यादेमुळे विलंब झाला,’ अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी शनिवारी निवेदनाद्वारे दिली होती. एअर इंडियाच्या प्रदीर्घ पल्ल्याच्या उड्डाणाला काही ना काही कारणामुळे प्रचंड विलंब होण्याची मागील आठवडाभरातील ही किमान तिसरी वेळ आहे. याआधी नवी दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को विमानाची ३० तासांहून अधिक रखडपट्टी झाली होती. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता उड्डाण करणार असलेले हे विमान शुक्रवारी रात्री ९.५५ वाजता रवाना झाले होते.
निकालाला काहीच तास बाकी, काँग्रेसच्या उमेदवारांसोबत राहुल गांधी आणि खर्गे यांची तातडीची बैठक, कारण काय? वाचा…
बोइंग७७७ या विमानाची वातानुकूलन यंत्रणा बिघडल्यासह अनेक घटक या विलंबाला कारणीभूत होते. मात्र या विलंबामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्यानंतरही एअर इंडियाने कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले नव्हते. या दीर्घ विलंबाबद्दल कंपनीने शनिवारी माफीनामा जारी केला होता, तसेच विलंबाबद्दल भरपाई म्हणून प्रत्येक प्रवाशाला ३५० अमेरिकन डॉलरचे प्रवास व्हाउचर दिले होते. आधी केंद्र सरकारची मालकी असलेल्या एअर इंडिया या विमान उड्डाण कंपनीचे जानेवारी २०२२मध्ये खासगीकरण करण्यात आले असून ती टाटा उद्योगसमूहाच्या हाती सोपवण्यात आली आहे.

डीजीसीआयची नोटीस

दरम्यान, नागरी हवाई वाहतूक महासंचालयालयाने (डीजीसीए) उड्डाणांना झालेला विलंब आणि प्रवाशांची काळजी घेण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवरून एअर इंडियाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली होती. ३० मे रोजीचे एआय १८३ दिल्ली-सॅनफ्रान्सिस्को आणि २४ मे रोजीचे एआय१७९ मुंबई-सॅनफ्रान्सिस्को या दोन उड्डाणांना झालेल्या प्रचंड विलंबाचा उल्लेख डीजीसीएने या नोटिशीत केला होता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.