Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Lok sabha Election Result 2024: २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला; पक्ष स्थापनेनंतरचे स्वप्न ४४ वर्षानंतर पूर्ण झाले

12

त्रिशूर: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ३७० जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवणाऱ्या भाजपला प्रत्यक्षात २५० जागा देखील मिळाल्या नाहीत. गेल्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपला १० वर्षानंतर मित्र पक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची वेळ येणार आहे. लोकसभेच्या निकालात महाराष्ट्रासह देशभरात अनेक ठिकाणी भाजपचे दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. भाजपला या बसलेल्या सेटबॅकमध्ये एक आनंदाची मोठी बातमी मिळाली आहे.

लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालात भाजपला अशी एक गुड न्यूज मिळाली आहे ज्याची प्रतिक्षा ते अनेक वर्ष करत होते. भाजपने गेल्या अनेक निवडणुकांपासून दक्षिणेतील राज्यावर फोकस केला होता. पण त्यांना कधीच यश मिळाले नाही. यात तामिळनाडू आणि केरळ या राज्याने भाजपला कधीच स्विकारले नाही. केरळ सारखे राज्य तर डाव्यांचा गड मानला जातो. या ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. केरळमधील त्रिशूर लोकसभा मतदारसंघात पक्षाचे उमेदवार आणि राज्यसभेचे खासदार सुरेश गोपी यांनी विजय मिळवला. भाजपच्या स्थापनेपासून केरळमध्ये विजय मिळवण्याचे त्यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. मात्र पक्षाला देशात मोठा झटका पहायला मिळाला.
Lok Sabha Election 2024 Result : ३७० आणि ४०० पार तर सोडा; इथे भाजपला साधे बहुमत मिळण्याचे वांदे, निवडणूक आयोगाची अधिकृत आकडेवारी पाहून पोटात येईल गोळा

सुरेश गोपी यांना एकूण ४ लाख १२ हजार ३३८ मते मिळाली. २०१९ साली त्यांचा याच मतदारसंघातून पराभव झाला होता. सिने अभिनेते असलेले गोपी यांनी यावेळी माकपच्या व्ही एस सुनिलकुमार यांचा यांचा पराभव केला. काँग्रेसचे के मुरलीधरन हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. सुरेश गोपी यांनी 74 हजार 686 मतांनी विजय मिळवला. त्रिशूरमधील हा विजय भाजपसाठी मोठा आश्वासक म्हणावा लागले.
Loksabha Election Result 2024: जागा कमी वैगरे काही नाही हा तर स्पष्ट पराभवच; भाजपचे कुठे आणि काय चुकले? पाच गोष्टी ठरल्या आत्मघातकी

केरळमध्ये लोकसभेच्या २० जागा असून त्यापैकी १४ जागा काँग्रेसने, २ जागा आययूएमएल, माकप, भाजप, केईसी आणि आरएसपी या पक्षांनी प्रत्येकी १ जागा जिंकल्या आहेत. राज्यात काँग्रेसला ३५.०६ टक्के, भाजपला १६.६८ टक्के मते मिळाली.

एकूण देशाचा विचार करता भाजपला २४०, काँग्रेसला ९९, सपाला ३७, तृणमूल काँग्रेसला २९, डीएमकेला २२, टीडीपीला १६ तर जनता दल युनायडेटला १२ जागा मिळाल्या आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.