Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bandh on 11th october: मविआची ११ ऑक्टोबरला बंदची हाक; ‘दोन्ही काँग्रेसह शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार’

15

मुंबई: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी प्रकरणी (Lakhimpur Kheri Violence Case) परवा ११ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पाठिंबा देत लखीमपूर घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र विकास आघाडीतर्फे (Maha Vikas Aghadi) बंद पुकारण्यात आला आहे. याची माहिती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) उपस्थित होते. देशात शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने या संयुक्त पत्रकार परिषदेतून एकजूट दाखवून भाजपला (BJP) इशारा देण्याचा प्रयत्न केला. (mp sanjay raut has said that shiv sena along with both the congress parties will participate in the october 11 bandh with full strength)

उत्तर प्रदेशात शेतकरी अगदी शांततेत उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत होते. परंतु केंद्रीय मंत्र्याच्याच मुलाने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घातली. यात शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. याविरोधात केंद्र सरकारने अजूनही कारवाई केलेली नाही. शेतकऱ्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत आहे. यामुळे महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आणि घटनेचा निषेध म्हणून सोमवारी बंद पुकारत आहे, असे या नेत्यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘सिंधुदुर्गच्या विकासाचे कारण नारायण राणे आहे, दुसऱ्याचे नाव येऊ शकत नाही’

पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत म्हणाले-

> महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार आहे.
> अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या करण्याची घटना घडली आहे.
> या मुद्द्यावर देशातील जनतेला जागे करण्यासाठी महाराष्ट्रात बंद पुकारला आहे.
> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी या बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असे आवाहन केले आहे.
> अन्नदाता शेतकरी एकटा नाही, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे.

क्लिक करा आणि वाचा- रामदास आठवलेंनी चिपी विमानतळावरून उडवले कवितेचे विमान

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक म्हणाले-

> लखीमपूरमध्ये एवढा मोठा गुन्हा घडलेला असतानाही अजूनही पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार नाहीत.
> शेतकऱ्याचा खून करणारा हा मंत्र्याचा मुलगा पळून गेला आहे.
> जालियनवाला बागेनंतर अशी घटना लखीमपूरमध्ये घडलेली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे.
> शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्षाचा काळ लोटला तरी देखील केंद्र सरकार त्यांच्यासी संवाद साधत नाही आहे.
> अन्नदाता शेतकऱ्याला खलिस्तानी, देशद्रोही म्हटले जात आहे.
> शेतकऱ्यांच्या रस्त्यात खिळे लावण्यात येत आहेत.
> भाजप शेतकऱ्यांचे हीत पाहणारा पक्ष नसून तो शेतमालाची लूट करणारा पक्ष आहे. > आता तर भाजप शेतकऱ्यांची हत्या करणारा पक्ष असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खान तुरुंगात बराक क्रमांक १ मध्ये; बाहेरचे अन्न घेता येणार नाही

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले-

> शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून त्यांना चिरडणे ही मानवतेला कलंक लावणारी घटना आहे.
> आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे आणि हा प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकीत करणारा आहे.
> ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना अडवण्यात आले. देशात हुकुमशाही आली आहे.
> कामगारांवर अत्याचार होत आहे. देशातील संवैधानिक संस्था मोडीत काढण्यात येत आहेत.
> विरोधकांवर दमनशाही केली जात आहे. यंत्रणांचा गैरवापर करत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.