Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Serious Crime: वर्दळीच्या भागात तरुणाची हत्या, चाकूनं सपासप वार; थरकाप उडवणारी घटना, लोकांची बघ्याची भूमिका

9

हैदराबाद : हैदराबाद जिल्ह्यातील बाळापूर उपनगरात गुरुवारी रात्री थरारक घटना घडली आहे. बाळापूरच्या रॉयल कॉलनीत भर रस्त्यात २८ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येचे हे थरारक दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे, ज्यामध्ये अज्ञात व्यक्तींच्या गटाने तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर हल्ला केला आहे.

पीडित तरुणाचे नाव समीर असून पोलिस मारेकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी परिसरातील अन्य सीसीटिव्ही देखील तपासत आहेत.
Thane Crime: नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण, मुलाची बापाला शिवीगाळ, संतापात वडिलांनी लेकाला संपवलं
व्हायरल झालेल्या बर्ड-आय व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, हल्लेखोर तरुणाचा पाठलाग करतायत, त्यांनंतर त्याला घेरत त्याच्या धडावर चाकूने हल्ला केला, ज्यातून झालेल्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. इतक्यात एका हल्लेखोराने पीडित तरुणाला मागे खेचले आणि तो जमिनीवर कोसळला. ज्यात त्याचा मृत्यू झाला आहे. तसेच क्लिपमध्ये, आरोपींपैकी एकाने पीडित समीरला पकडले आणि जबर मारहाण केली. हे पाहून देखील आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी न करता आपला रस्ता पकडला, असे देखील निदर्शनास आले.

पोलिस म्हणाले की, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात केली असून पुढील तपास करत आहोत. तर समीरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उस्मानिया शवागारात हलवण्यात आला आहे. हत्येमागील नेमका हेतू अद्याप अस्पष्ट आहे. पीडित आणि मारेकरी एकमेकांना ओळखत होते? की त्यांच्यात झालेल्या टोकाच्या वादाला हिंसक वळण लागले, याचा तपास करण्याचा प्रयत्न करत पोलिस करत आहेत.
एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय तरुणीचे करवतीने केले तुकडे; ९ वर्षानंतर आरोपीला मिळाला जामीन
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी तेलंगणातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल राज्यातील काँग्रेस सरकारला घेरले आहे. ते एक्सवर पोस्ट करत म्हणाले, ‘मुहम्मद समीरला हैदराबादमध्ये माफियांनी संपूर्ण सार्वजनिक जागेत क्रूरपणे मारले आणि ठार केले. काँग्रेसने सत्ता हाती घेतल्यापासून तेलंगणातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली आहे. कल्पना करा की, समीरला भाजपशासित राज्यात असेच मारले गेले असते तर अनेकांनी UN गाठले असते. पण तेलंगणात धर्मनिरपेक्ष अंधत्वामुळे कथा कोणाच्याही नजरेला पडत नाही.’



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.