
Tej Police Times
क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद हा सरकार पुरस्कृत दहशतवादच’; फडणवीस यांचा निशाणा
अमृता फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्र बंदवर टीका केली आहे. मला कोणी सांगू शकेल का की आज वसुली चालू आहे की बंद?, असा खोचक सवाल उपस्थित करत अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. या ट्विटच्या माध्यमातून फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख वसुली करणारे सरकार असा करत पुन्हा एकदा डिवचले आहे. आपल्या या ट्विटमध्ये त्यांनी ‘महाराष्ट्र बंद नही है’ (#MaharashtraBandhNahiHai) असा हॅशटॅगही जोडला आहे. या द्वारे त्यांनी बंदला विरोध दर्शवला आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘महाराष्ट्र बंद’; ‘जनता असाच सरकारला शासकीय इतमामात निरोप देईल’
क्लिक करा आणि वाचा- ‘कोणी म्हणेल सिंधुदुर्ग किल्लाही मीच बांधला’; मुख्यमंत्री- राणेंचे ‘असे’ रंगले वाकयुद्ध
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा पलटवार
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमृता फडणवीस यांनी केलेल्या टिकेवर पलटवार करत प्रत्युत्तर दिले आहे. वसुलीमध्ये कोण पुढे आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. देशपातळीवर आणि देशातील ज्या ज्या राज्यात भाजपप्रणित सरकार आहे, त्या ठिकाणी वसुलीबाबत त्यांना (अमृता फडणवीस) माहिती आहे. म्हणूनच त्यांनी अशा पद्धतीने टीका करणारे ट्विट केले असावे अशा शब्दात पटोले यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.