
Tej Police Times
लोकसभा प्रचारावरुन मल्लिकार्जुन खरगे पीएम मोदींच्या भाषणाचा दाखला देत होते, यादरम्यान काँग्रेसच्या घोषणापत्राला कश्याप्रकारे एका धर्मांशी जोडून बदनाम करण्यात आले याचा उल्लेख करत खरगेंनी सभापती जगदीप धनखड यांना सभागृहात सांगितले. लोकसभेच्या दरम्यान काँग्रेसवर बोलताना मोदींनी अनेक वादग्रस्त विधाने दिलीत ज्यासाठी काँग्रेसने निवडणुक आयोगात तक्रार सुद्धा दाखल केली पण मोदींविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही.
Rahul Gandhi : स्वतःला हिंदू म्हणवणारे लोक दिवसरात्र हिंसा करतात… राहुल गांधींच्या विधानावर लोकसभेत प्रचंड गदारोळ
खरे बोलणार फार कमी बोलतात पण खोटे बोलणार रेटून खोटे बोलतात. एकदा खोटे बोले की शंभरवेळा खोट्यावर खोटे बोलावे लागते पण खरे बोलण्याचे तसे नसते एकदा खरे बोलले की पुन्हा काही खोटे बोलण्याची गरज लागत नाही आणि मोदींचे बोलणे असेच खोटे आहे असा त्यांनी टोला लगावला.यावर उत्तर देताना पुढे खरगे म्हणाले जर तुम्हाला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर मी हात जोडून माफी मागतो असे म्हणत खरगेंनी सभापती धनखड यांच्याकडे पाहत माफी मागितली.
पुढे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले निवडणुकीच्या काळात निवडणुक आयोगात आम्ही ११७ तक्रार आम्ही नोंदवल्या होत्या त्यातील १४ मोदीं विरोधात होत्या पण कोणतीही कारवाई झाली नाही. निवडणुक आयोग एक संवैधानिक संस्था आहे. लोकांचा आयोगावर विश्वास आहे पण आम्ही केलेल्या तक्रारी विरोधात कोणतीही कारवाई झाली नाहीच. निवडणुकीच्या काळात काँग्रेसच्या घोषणापत्रावरुन भाजपाने कांगवा केला होता तसेच देशातील अल्पसंख्याक, मंगळसूत्राचा मुद्दा, जमीनीचा मुद्दा, अशा विविध मुद्यांना धरत भाजपने टीकेची झोड उठवली होती.
Recover your password.
A password will be e-mailed to you.