Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Anant and Radhika Wedding shiv shakti puja : अनंत – राधिकाने लग्नापूर्वी केली शिव-शक्तीची पूजा, महाभारत-रामायणातही उल्लेख

11

Anant and Radhika Wedding Puja Ceremony

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे १२ जुलैला लग्न आहे. अंबानी कुटुंबातील अनेक प्री-वेडिंग विधींची बरीच चर्चा झाली होती. पण अंबानी कुटुंबाने नेहमीच जुन्या परंपरांना अधिक महत्त्व दिले आहे.

लग्नाशी संबंधित अशीच एक परंपरा अँटिलियामध्ये करण्यात गेली आहे. अंबानी कुटुंबाने शिवशक्तीच्या पूजेचे आयोजन केले होते. परंतु, लग्नाआधी शिवशक्ती पूजेचे महत्त्व काय? लग्नाआधी ही पूजा का केली जाते? पौराणिक कथांनुसार रामायण आणि महाभारतात लग्नापूर्वी शिवशक्तीची पूजा केली जात असे. जाणून घेऊया लग्नापूर्वी शिवशक्ती पूजेचे महत्त्व

1. लग्नापूर्वी शिवशक्ती पूजन करण्याचे महत्त्व

नीता अंबानी यांनी अनंत अंबानीच्या लग्नाची पत्रिका काशी विश्वनाथच्या मंदिरात गेल्या होत्या. अनेक विवाहाच्या विधींमध्ये शिवशक्तीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, लग्नापूर्वी शिवशक्तीची पूजा केल्याने शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद मिळतो. तसेच वधु-वरांच्या आयुष्यात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. पती-पत्नीचे नवग्रहही सुधारतात.

2. जोडप्यांसाठी ही पूजा अधिक महत्त्वाची

पौराणिक मान्यतेनुसार लग्नापूर्वी वधु-वराने शिवशक्तीचे पूजन केल्याने भगवान शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद राहातो. तसेच पती-पत्नीचे नाते अधिक दृढ होते. शिव आणि पार्वती मिळून शक्तीचे पूर्ण रुप बनते असे म्हटले जाते. या पूजेत वराला शिवाचे रुप मानले जाते आणि वधुला देवी शक्तीचे अर्थात पार्वतीचे रुप मानले जाते.
शिवपुराणात असे म्हटले आहे की, शंकराला मिळवण्यासाठी पार्वतीने शिवशक्तीचे पूजा केली होती. तसेच प्रत्येक युगात देवी पार्वतीने शंकरासाठी जन्म घेतला आहे. सतीच्या रुपात सुद्धा देवी शक्तीने शिवाला वर म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. अनेक जन्मापासून शिव आणि शक्तीचा संगम मानला जातो.

3. देवी सीतेनेही रामायणातही केली शिव-पार्वतीची पूजा

असे म्हटले जाते की, रामायणाच्या काळात देवी सीतेने देखील चांगला पती मिळवा यासाठी शिव आणि पार्वतीची पूजा केली. रामायणानुसार देवी सीता हे लक्ष्मीचे रुप मानले जाते. तिच्या जन्मानुसार तिला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. परंतु, देवी सीतेला कल्पना होती की, मानव रुपात जन्म घेऊनही तिचा विवाह भगवान विष्णूचा अवतार श्री राम यांच्याशी होणार आहे. देवी सीतेने लग्नाच्या वयात आल्यावर शिव-पार्वतीची पूजा केली

4. महाभारतात सुभद्रेने अर्जुनाला मिळवण्यासाठी केली शिवशक्तीची पूजा

महाभारतात देखील शिवशक्ती पूजेचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हटले जाते की, सुभद्राने अर्जुनला पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती त्याच्या प्रेमात पडली होती. परंतु, अर्जुनने द्रौपदीशी विवाह केला होता. पण सुभद्रा अर्जुनला आपला पती म्हणून घेण्याची इच्छा सोडू शकली नाही. महाभारताच्या कथेनुसार, सुभद्राने अर्जुनला तिचा पती म्हणून प्राप्त करण्यासाठी शिव-शक्तीची पूजा केली होती.

5. शिवशक्तीची भारतातील अनेक राज्यात केली जाते पूजा

विविधतेने नटलेल्या भारतातील अनेक राज्यात शिवशक्तीची पूजा करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे. अनेक राज्यांमध्ये लग्नापूर्वी फक्त वधुच शिवशक्ती पूजा करतात. तसेच काही भागात मुलींना लग्नाचे वय झाल्यावर गौरी पूजन केले जाते. ज्यामुळे मुलींना योग्य वर मिळू शकेल. भारतात काही ठिकाणी लग्नानंतर नवविवाहित जोडप्यांची शिवशक्तीची पूजा केली जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.