Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ashadhi Ekadashi Daan Vidhi : देवशयनी एकादशीला ६ शुभ संयोग! राशीनुसार करा दान-धर्म लक्ष्मी नारायणाची बरसेल कृपा, संकटातून होईल सुटका
दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी तिथी साजरी केली जाते. आषाढी एकादशीचे व्रत बुधवारी १७ जुलैला केले जाणार आहे. या दिवशी श्रीविष्णू चार महिन्यांसाठी योगनिद्रावस्थेत जातात. या तिथीला देवशयनी एकादशी या नावनेही ओळखले जाते. तसेच या दिवसापासून चातुर्मास सुरु होतो.
यावेळी देवशयनी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग, शुक्ल योग, बुधादित्य योग आणि लक्ष्मी नारायण योग यांचा शुभ संयोग तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या शुभ संयोगामध्ये देवशयनी एकादशीला राशीनुसार उपाय केल्याने भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीची देखील कृपा राहाते. तसेच जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय करायला हवे.
मेष
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांनी देवशयनी एकादशी तिथीचे व्रत करावे. तसेच लाल वस्त्र परिधान करुन भगवान विष्णूला लाल रंगाची फुले अर्पण करावी. या दिवशी ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. असे केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते. तसेच सर्व संकंटांपासून मुक्ती मिळते.
वृषभ

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. त्यामुळे या दिवशी व्रत करुन तांदूळ, साखर, दूध, पांढरे वटाणे किंवा पांढऱ्या वस्तूंचे दान करावे. श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मीला मखाण्याची खीर अर्पण करावी. या दिवशी ओम संकर्षणाय नम: या मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारच्या समस्या दूर होतील. तसेच जीवनात प्रगती होईल.
मिथुन

मिथुन राशीचा स्वामी बुध असून या दिवशी व्रत केल्याने पुण्य मिळते. तसेच गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. गरजू व्यक्तींना मूगाची डाळ दान करावी. तसेच घराच्या मुख्य दिशेला तुपाचा दिवा लावावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नम: मंत्राचा जप करावा. असे केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते.
कर्क

कर्क राशीचा स्वामी चंद्र असून आषाढी एकादशीच्या दिवशी घरात लवंग आणि कापूर जाळावा. तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा. ही खीर सर्वांना प्रसाद म्हणून वाटा. नारायणाय विद्महे या मंत्राचा जप करा. तसेच वासुदेवाया सावकाश । तन्नो विष्णुः प्रचोदयात् । या मंत्राचा १०८ वेळा नामस्मरण करा. असे केल्याने सर्व प्रकारचा ताण दूर होऊन मानसिक शांती मिळते.
सिंह

सिंह राशीचा स्वामी सूर्य देव असून या राशीच्या लोकांना आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे. तसेच भगवान विष्णूला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करा. श्रीहरीला मध आणि गूळाचा नैवेद्य अर्पण करा. तुळशीची पूजा करा. दिवसभरात श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवायाचे भजन करावे.
कन्या

कन्या राशीचा स्वामी बुध असून या दिवशी भगवान विष्णूला पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी. तसेच पिवळ्या रंगाची फुलेही अर्पण करावीत. फुले, फळे किंवा धान्य दान करा. वडाच्या झाडाला जल अर्पण करा. असे केल्याने आर्थिक लाभ आणि नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती होते.
तुळ

तुळ राशीचा स्वामी शुक्र असून या दिवशी सत्तूचे सरबत दान करावे. तसेच भगवान विष्णूला केशर दूध अर्पण करा. ओम हूं विष्णुवे नमः या मंत्राचा जप करा. गरीब आणि गरजू मुलींना दूध आणि दही दान करा. असे केल्याने उत्पन्नाचा स्त्रोत वाढेल. तसेच प्रत्येक कामात यश मिळेल.
वृश्चिक

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. या दिवशी श्रीविष्णूला हरभरा आणि जवाचा सत्तू अर्पण करा. तसेच मसूर डाळीचे दान करा. ओम ए: अनिरुद्धाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने तुमची सर्व समस्या दूर होतील. तसेच करिअरमध्ये यश मिळेल.
धनु

धनु राशीचा स्वामी गुरु असून या दिवशी भगवान विष्णुला पिवळे वस्त्र, फुले, फळे इत्यादी अर्पण करावे. पिवळे फळ दान केल्याने फलदायी ठरेल. तसेच गरीब आणि गरजी लोकांना जेवू घाला. प्रद्युम्नाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने सर्व कामे पूर्ण होतील. उत्पन्नात वाढ होईल.
मकर

मकर राशीचा स्वामी शनि असून या दिवशी भगवान विष्णूला केशर आणि दही अर्पण करुन तुळशीजींची पूजा करावी. गरीब आणि गरजू लोकांना अन्न दान करा. प्राणी आणि पक्ष्यांना खाऊ घाला. ओम ए: अनिरुद्धाय नमः या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने तुम्हाला सर्व संकटांपासून मुक्ती मिळेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आनंद वाढेल.
कुंभ

कुंभ राशीचा स्वामी शनि असून या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच सात किंवा अकरा वेळा झाडाला प्रदक्षिणा घाला. ८०० ग्रॅम दूध उडीद डाळीसोबत वाहत्या पाण्यात ओतावे. असे केल्याने सर्व प्रकारच्या दु:खापासून मुक्ती मिळते.
मीन

मीन राशीचा स्वामी गुरु आहे. मीन राशीच्या लोकांनी आषाढी एकादशीच्या तिथीच्या दिवशी व्रत करावे. भगवान नारायणाला नारळ आणि साखरेचा प्रसाद अर्पण करावा. मातीचे भांडे मधाने भरून मंदिरात ठेवावे किंवा एखाद्या रिकाम्या जागी पुरावे. ओम विष्णवे नम: या मंत्राचा १०८ वेळा जप करा. असे केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच कुटुंबात सुख-शांती नांदेल.