
Tej Police Times
संगम माहुली येथील कैलास स्मशानभूमीमध्ये सततच्या पावसामुळे खालचा टप्प्यावर पाणी आले असून दहा अग्नीकुंड पाण्याखाली गेले आहेत. वरील टप्प्यावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. मात्र, संततधार पाऊस व कण्हेर धरणाचे पाणी सोडण्यात आल्याने संपूर्ण कैलास स्मशानभूमी पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे असल्यास संपर्क करून माहिती घेऊनच कैलास स्मशानभूमीत अंत्यसंस्कारसाठी मृतदेह आणावेत, असे आवाहन श्री बालाजी ट्रस्टचे राजेंद्र चोरगे यांनी केले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.