एरंडोल येथे गांधीपुरा भागात न.पा.निवडणुकीसाठी झालेल्या बैठकीत उपर्या उमेदवारांना प्रखर विरोध..!

(शैलेश चौधरी)

एरंडोल:येथे शहराच्या मध्यभागी अंजनी नदी असून पूर्वेकडील भाग ‘पूरा, म्हणून ओळखला जातो.
या पूरा भागातील काही प्रतीष्ठीत नागरीकांची येथील दत्तमंदीरात बैठक होऊन पूरा भागाबाहेरील उमेदवार निवडणुकीत उभा राहील्यास त्याला कडाडून विरोध करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला तसेच गांधीपुरा विकास आघाडी ची स्थापना करण्यात आली,याद्वारे पुरा भागातीलच उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवुन त्यांनाच विजयी करण्याचा निर्धार करण्यात आला.
या आघाडीत सर्वसमावेशकता राखून सक्षम उमेदवार देण्याचे ठरविण्यात आले.


या निर्णयांमुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत ‘बाहेरी,
उमेदवार निवडणुक रिंगणात उतरण्याचे धाडस करणार काय..? या बैठकीत घेतलेले निर्णय पुरा भागातील सर्व मतदारांना मान्य होणार काय..? पुरा भागातील मतदार पुर्यातीलच उमेदवारांना नगरपालिकेत पाठविणार काय..?
उपर्या उमेदवारांना धूळ चारणार की त्यांच्या कपाळी विजयी गुलाल लावणार..? यांसारखे अनेक प्रश्न नागरीकांच्या शेकोटीवरील चर्चांमधून उपस्थित केले जात आहेत.


बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव अहिरराव होते, प्रास्ताविक बी.जी.लोहार यांनी केले,सूञसंचालन छोटू खैरनार यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रविण ढाकणे यांनी केले.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत एरंडोल नगरपालिका स्थापन होऊन दिडशे वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला तरी ही पूरे भाग सुखसुविधा व बदलत्या काळानुसार आवश्यक असलेल्या विकासकामांपासुन वंचित राहून पुराभाग ‘अपुराच, राहीला आहे.


या बैठकीस अँड.अहेमद सय्यद,सुभाष मराठे,चिंतामण पाटील,सुनिल चौधरी,विठ्ठल आंधळे,दामोदर वंजारी,ईश्वर बिर्हाडे,भारत बोरसे,सुनिल मराठे,चंदु जोहरी,राजेश साळी आदी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment