एरंडोल : शुक्रवारच्या राञी अंजनी धरणानजीक असलेल्या रामचंद्र आनाजी भोई यांच्याशेतात बिबटयाने बांधलेल्या गुरांपैकी एका वासराचा व एका पारडाचा फडशा पाडला.
या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये भिती पसरली आहे.
रामचंद्र भोई हे गेल्या २० ते २२ वर्षांपासून शेतात बैलजोडी, गायी-म्हशी बांधतात.
दरम्यान…
वनखात्याचे ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तर डॉ. अशोक महाजन यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले. रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी राञी शेतकर्यांना जावे लागत असल्यामुळे या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करण्यात यावा अशी जोरदार मागणी शेतकर्यांनी केली आहे.