एरंडोल: महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाच्या येथील बसआगारातील संपावर असलेल्या कर्मचार्यांपैकी १६ कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे व २३ कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
त्यामुळे एस-टी कर्मचार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तथापी..
अजुनही २०७ कर्मचारी संपाच्या तंबूत ठाण मांडून बसले आहेत.
एरंडोल बसआगारातील संपावर असलेल्या सर्व कर्मचार्यांना आगार प्रशासनाकडुन कामावर हजर होण्याबाबत कारणे दाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरीसुध्दा अजुनही मोठ्या संख्येने एस-टी कर्मचारी संपावर ठाम आहेत.
जवळपास साडेतीन महीन्यांपासून एस-टी संप सूरूच असल्यामुळे प्रवाश्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
जळगाव व धुळे येथून काही थेट बससेवा सुरू झाल्या आहेत माञ त्या बसगाड्यांना एरंडोल बसस्थानकावर थांबा नसल्यामुळे प्रवाश्यांमध्ये संतापजनक प्रतीक्रीया उमटत आहेत.
एरंडोल येथुन दिवसभरातुन जळगाव-धुळे जाणार्या सारख्या अंतराने किमान ६ गाड्या सोडण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
सद्यस्थितीत एरंडोल बसआगाराच्या केवळ १० गाड्याच बाहेर फिरत असुन ४०गाड्या अजुनही संपाच्या निद्रेत आगाराच्या आवारातच आहेत.
१५चालक, १३वाहक, १५प्रशासकीय कर्मचारी, ४यांञिक कर्मचारी असे एकूण ४७ एस-टी कर्मचारी कर्तव्यावर आहेत.