एरंडोल: येथुन जवळ असलेल्या पळासदळ शिवारात अंजनी धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे तसेच विजपुरवठा ही सुरळीत व नियमित होत आहे.
माञ.. वाढत्या चोर्यांमुळे या अनुकूल स्थितीचा फायदा घेणे शेतकर्यांना अशक्य झाले आहे.
आजवर अस्मानी किंवा सुलतानी या प्रमुख संकटांचा कृषीउद्योगास फटका बसत होता माञ पळासदळ शिवारात अज्ञात चोरट्यांनी विहीरींवरील विद्युत मोटारी,पाणबुड्या व शेतात असलेली गुरे-ढोरे लंपास करण्याचे सञ सुरूच ठेवले आहे.
काही दिवसांपुर्वी सुरेश राजधर देशमुख यांच्या शेतातील विहीरीवर ठेवलेली विद्युत मोटारीवर चोरट्यांनी डल्ला मारला. दुसर्या दिवशी ते बाजरी व फरदड कपाशिस पाणी भरण्यास गेले असता विद्युत मोटारीची चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला.
दुसर्या घटनेत सुरेश गोविंदा महाजन यांचे सुमारे ३०हजार रूपये किंमतीचे २ वळू(बैल) रातोरात लंपास केल्याची घटना घडली.
तीसर्या घटनेत एका शेतकर्याची विद्युत मोटार कुणाचा तरी सुगावा लागल्याने विहीरीवरून काढुन थोड्या अंतरावर फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले.