तुळशीचं लग्न लावण्याची योग्य पद्धत, जाणून घ्या तुळशी विवाहाची संपूर्ण विधी

दिवाळी संपली की, सर्वांना वेध लागतात ते तुलसीच्या लग्नाचे. शुभंकर पावलांनी येणारी दिवाळी सुखाचा रेशीम धागा जगण्याला जोडून देते. प्रत्येकाची जगण्यासाठी रोजची धावपळ सुरूच असते. मग त्यात चिंता, व्यथा या तर नेहमीच्याच असतात. दिनक्रमामधील धावपळ, दगदग, ताणतणाव यांनी व्यापलेल्या आयुष्यात हे सण मनाला उभारी देतात. त्यात दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव मनातील अंधार दूर करून प्रकाशाकडे वाटचाल करा, असा संदेश देणारा आणि मग ती संपली की लगबग सुरू होते ती तुलसीच्या लग्नाची. कार्तिक शुद्ध एकादशीपासून तुलसी विवाह प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा विधी चालतो. यंदा १५ नोव्हेंबर २०२१ रोजी तुलसी विवाह प्रारंभ होत आहे. जाणून घेऊया तुलसी विवाहाची संपूर्ण विधी…

कन्यादानाचे पुण्य

कार्तिकी एकादशीला सर्व मंगलकार्यांची सुरुवात केली जाते. तुलसी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाह सोहळा सायंकाळी करतात.

​​अश्याप्रकारे सजवा तुळशीचे रोपटे

दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी तुळशीचे लग्न थाटामाटात लावले जाते. घराच्या अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवण्यात येते. तुळशी वृंदावन, तसेच कुंडी रंगवून त्यावर राधा-दामोदरचे चित्र काढण्यात येते. फ्लॅट संस्कृतीत अनेकांनी तुळशीला आपल्या बाल्कनीत जागा दिली असून त्या ठिकाणीच लग्नाची तयारी केली जातेय. तुळशीच्या रोपट्याभोवती ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र चढवा. तुळशी विवाहाला तुम्हाला तुमचे अंगण आकर्षक रांगोळ्यांनी सजवायचे असेल, तर छान रांगोळीही काढण्यात येते.

​गौरीप्रमाणे पूजा

प्रत्येकजण आवडी प्रमाणे आणि हौस म्हणून तुळशीला सजवण्याचा प्रयत्न करत असतो. काही जण तुळशीच्या रोपट्याला साडी देखील नेसवतात.तुळशीला नवरीसारखे सजवण्यात येते. तुळशीची गौरीप्रमाणे पूजा करतात. तिला साडी, चोळी, नथ, सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरतात. तुळशीला नैवद्याचे गोड पदार्थ घराण्याच्या परंपरेनुसार केले जातात.

​तुलसी विवाहाची पूर्वापार पद्धत

लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुलसीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवावी, यजमानाने म्हणजे श्रीकृष्णाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसनावर बसवावे.

गोरज मुहूर्तावर वराचे पूजन करावे. तुळशीचा विवाह केल्याने भगवाण विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होते. कारण, पोथी-पुराणात सांगितलेल्या कथेनुसार तुळस ही लक्ष्मीचे तर भगवान विष्णूने शाळीग्रामचे रुप धारण केले होते. त्यांनी असे का केले याचे उत्तर ब्रह्मवैवर्त पुरानातील कथेत मिळते.

कार्तिक महिन्यात काय वर्ज्य करावे जाणून घ्या

Source link

the right way to tulsi vivahTulsi Vivah 2021tulsi vivah 2021 in marathitulsi vivah vidhi in marathiतुळशी विवाहाची संपूर्ण विधी​​तुळशी विवाह​तुळशी विवाह 2021​तुळशीचं लग्न लावण्याची योग्य पद्धत
Comments (0)
Add Comment