याबाबत पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी की, अजित कश्यप, अभिजित रोहिला, आलोक रावत, प्रभाकर पवार, ओंकार साधले हे मुळशी तालुक्यात असणाऱ्या डोंगरवाडी येथील प्लस व्हॅली येथे ट्रेकिंगसाठी आले होते. पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर असणारी ही व्हॅली प्रसिद्ध आहे. या व्हॅलीत तीन कुंड असून येथे लोक पोहण्यासाठी उतरत असतात.
त्यातील एका कुंडात अजितचे दोन मित्र उतरले होते. त्यानंतर अजित पाण्यात उतरत असताना त्याचा तोल गेल्याने त्याचे डोके कुंडामधील दगडावर आदळले. तो अतिशय घाबरलेल्या आवस्थेत होता. तरीही तो पाण्यात हात पाय मारत होता. जवळ पोहत असलेल्या ट्रेकर्सनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत तो पाण्यात बुडाला होता.
मित्रांनी आरडाओरडा केल्यानंतर एकच धावपळ उडाली. त्यानंतर पोलिसांना आणि रेस्क्यू टीमला कळवण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिस रेस्क्यूसह घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत अजित खोल पाण्यात बुडाला होता. पोलिसांनी त्याला रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
हेही वाचा : बिहारच्या वैशालीमध्ये मोठा अपघात, ट्रकने ३० जणांना चिरडलं, १२ जणांनी जीव गमावला
अखेर तीन ते साडेतीन तासांच्या प्रयत्नानंतर रेस्क्यू टीमला अजितला बाहेर काढण्यात यश मिळाले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून अजित कश्यप याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा : संजय करलेची अन्यत्र हत्या, नंतर मृतदेह ऑडीत टाकला, एका निरीक्षणातून पोलिसांचा निष्कर्ष