आजपासून शहरात रिक्षा बंद, १९ रिक्षा संघटनेच्यावतीने एक डिसेंबरपासून बेमुदत संप

औरंगाबाद : रिक्षा मीटर कॅलीब्रेशनसाठी तीस दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ मार्च २०२४ पर्यंत करावी. रिक्षा थांबे देण्यात यावे. रिक्षा पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात यावे. या मागण्यासाठी १९ रिक्षा संघटनेच्यावतीने औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीने शहरात आज, एक डिसेंबरपासून रिक्षा बंदचे आवाहन केले आहे. सदर बंद बेमुदत असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

औरंगाबाद रिक्षा चालक-मालक कृती समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात शहरातील १९ रिक्षा संघटनेचा रिक्षा बंदला पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. औरंगाबाद रिक्षा चालक मालक कृती समितीत बहुजन हिताय रिक्षाचालक-मालक संघटना, शिव वाहतूक सेना, वस्ताद वाहतूक दल, अखिल भारतीय भ्रष्ट्राचार विरोधी रिक्षाचालक-मालक संघटना, वाय एफ रिक्षा युनियन, परिवर्तन अॅटो चालक-मालक संघटना, महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, काँग्रेंस रिक्षा युनियन, पँथर पॉवर रिक्षाचालक-मालक संघटना, महाराष्ट्र वाहतूक सेना, मराठ मावळा संघटना आणि रिपाई चालक मालक संघटना अशा संघटनांचे नाव जाहिर करण्यात आले आहे. या निवेदनात रिक्षा मीटर कॅलिब्रेशनसाठी २८ मार्चपर्यंत मुदतवाढ करावी. रिक्षा चालक व मालकांना आधार मिळणार आहे. याशिवाय रिक्षा चालकांना रिक्षाचे इन्श्युरन्स, पीयूसी, टॅक्स, मीटर कॅलीब्रेशन, वाहन पासिंग करण्यासाठीही २८ मार्चपर्यंत मुदत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पण पुढचे १० ते १५ दिवस धोक्याचे; काळजी घ्या!
रिक्षाचालकांना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान

औरंगाबाद रिक्षाचालक-मालक कृती समितीने दिलेल्या निवेदनात शहरात रिक्षाचालकांवर प्रवासी सोडण्यासाठी थांबलेले असताना, त्यांच्या विरोधात २८३ अंतर्गत पेालिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. कागदपत्राबाबत वाहतूक पोलिसांनी केली. ही कारवाई बंद करावी. रिक्षाचालकांना गुन्हेगार बनविण्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करून कंपनीसाठी कामगाराची वाहतूक करणाऱ्या बसमधून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. त्यांच्यावर संबंधीत विभागाकडून कारवाई होत नसल्याचाही आरोप रिक्षाचालक संघटनांकडून करण्यात आला आहे.

‘आधी स्टँड द्या; मग कारवाई करा’

शहरात रिक्षा चालविण्यासाठी आरटीओ विभागाकडून परवाने दिले जात आहे. मात्र, रिक्षा थांबे निश्चित करण्यात येत नाही. तसेच शासनाकडून अधिकृत प्रवासी वाहतूक परवानगी असताना रिक्षा चालकांना प्रवासी सोडण्यासाठी पीक अप आणि ड्रॉप पॉईंट देण्यात येत नाही. आधी अधिकृत रिक्षा स्टॅँड द्या. त्यानंतर दंडात्मक कारवाई करा.

कॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ

दरम्यान, बुधवारी (३० नोव्हेंबर) आरटीओ कार्यालयात रिक्षाचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आरटीओ संजय मैत्रेवार यांनी घेतली. या बैठकीत रिक्षा चालकांच्या मागणीनुसार ३० दिवसाची मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जाहीर केले. गेल्या तीन वर्षांपासून रिक्षाचालकांवर कारवाई बंद आहे. यामुळे शहरात बेशिस्तीत वाढलेली आहे. यामुळे रिक्षा विरोधात सुरू असलेली कारवाई थांबणार नसल्याचे स्पष्ट उत्तर आरटीओ विभागाकडून देण्यात आले.

रिक्षाचालक संघटनांनी बंद नाकारला

रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदमध्ये रिक्षाचालक संयुक्त संघर्ष कृती महासंघ भाग घेणार नसल्याची घोषणा करण्यात आली आहे. या संघटनेमध्येही अनेक रिक्षाचालक संघटना असून त्यांनी पोलिस व आरटीओच्या कारवाईचे समर्थन केले आहे. अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद यांनी दिली.

अतिआवश्यक सेवा सुरू

एक डिसेंबर पासून पुकारण्यात आलेल्या रिक्षा बंद आंदोलनात अत्यावश्यक सेवामधील रिक्षा चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती रिक्षाचालक-मालक कृती समितीने जाहीर केले आहे. या रिक्षा वगळता अन्य रिक्षा बंद राहतील, अशीही घोषणा करण्यात आली आहे. एक डिसेंबरला रिक्षा बंद असल्याकारणाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या अनेक रिक्षचालकांनी विदयार्थी वाहतूक आज बंद राहणार आहे, असेही पालकांना फोन करून सांगितले आहे.

शिवरायांची तुलना थेट मुख्यमंत्र्यांशी, पर्यटनमंत्री लोढा यांच्या वक्तव्यावरून वाद; म्हणाले…

Source link

aurangabad auto rickshawauto rickshaw strike news todayrickshaw strike newsrickshaw strike news todayऔरंगाबाद न्यूज लाइव्हऔरंगाबाद बातम्या आजच्या
Comments (0)
Add Comment