कर्नाटक- महाराष्ट्र सीमावाद सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय, शहाजी महाराजांचे समाधीस्थळ…

कोल्हापूरः कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये सीमावादाची लढाई सुरू असतानाच ही दोन्ही राज्ये एका गोष्टीसाठी एकत्र येणार असल्याची शक्यता आहे. कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधी स्मारकाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र सरकार कर्नाटकसोबत हातमिळवणी करणार आहे. त्यासंबंधी भाजप नेते व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संकेत दिले आहेत.

शहाजी महाराज यांचे निधन २३ जानेवारी १६६४ साली कर्नाटक राज्यातील होदिगेरे जिल्ह्यात झालं. इथेच शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आहे. शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या शहाजीमहाराजांची समाधी कर्नाटकात उघड्याबोडक्या अवस्थेत आहे. शहाजी महाराजांसोबत कर्नाटकात गेलेल्या काही मराठ्यांचे वशंज आजही नित्यनेमाने या समाधीस्थळाला भेट देतात. शहाजी महाराजांचे समाधी स्थळ आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या यादीत असले तरीही या स्थळाचा विकास मात्र हवा तसा अजूनही झाला नाहीये. याकडे महाराष्ट्र सरकारने लक्ष वेधले आहे. तसंच, समाधीचा जिर्णोद्धार करण्याचा सरकारचा प्रयत्न असून लवकरच चंद्रकांत पाटील कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहेत.

वाचाः महाराष्ट्र हादरला! नातवाने मुलीला पळवून नेलं, संतापलेल्या जमावाने त्याच्या आजीला दिली भयानक शिक्षा

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन दोन्ही राज्याकडून करण्यात आलेल्या आरोप-प्रत्यारोपांवरुन वातावरण तापलं असतानाच महाराष्ट्र सरकारने सीमाभागांवर राहणाऱ्या लोकांसाठी योजना आणल्या आहेत. यामध्ये कर्नाटकात राहणाऱ्या लोकांना मराठी शिकण्यास मदत होणार आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली आहे. सरकार सीमाभागातील नागरिकांसाठी काही विशेष योजना आखत आहोत. मुंबईत त्यासंबंधी बैठका घेत आहोत. शहाजी महाराजांच्या समाधीस्थळाचा जिर्णोद्धार करण्यासाठी सरकार पुढाकार घेत आहे. त्यासाठी कर्नाटक सरकारकडे प्रस्ताव सादर करणार आहोत. तसंच, स्मारकासाठी आवश्यक असलेली रक्कम कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात येतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार

मराठी शाळांची बांधणी, मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांची भरती तसंच कर्नाटकातील शहाजी महाराजांच्या समाधीचं स्मारक बांधण्यासंदर्भातील बोलणी कर्नाटक सरकारसोबत करण्यात येणार आहेत. यातून दोन्ही राज्यांतील कटुता कमी होऊन सहकार्याची भावना वाढीस लागेल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वाचाः असं कसं घडलं! स्वयंपाकघर तेलंगणात तर बैठक खोली महाराष्ट्रात; या अनोख्या घराची तुफान चर्चा

Source link

maharashtra karnataka bordershahaji maharaj memorialshahaji maharaj memorial in karnatakaमहाराष्ट्र-कर्नाटकशहाजी महाराजांचे समाधीस्थळ
Comments (0)
Add Comment