केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला

मुंबई, दि. १ : केशवराव धोंडगे यांच्या निधनाने संघर्ष हेच जीवन मानणारा नेता हरपला, शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, कष्टकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावा, यासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अंधश्रद्धा आणि त्यामुळे येणारी सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक गुलामगिरी यातून भोळ्याभाबड्या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी समाज जागृतीचे कार्य केले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांचा गौरव करण्यात आला होता. मराठवाड्याची मुलुख मैदानी तोफ म्हणून त्यांची ओळख होती. विधानसभेत त्यांची भाषण त्या काळात प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने नव्या पिढीचा मार्गदर्शक हरपला.

000

Source link

Comments (0)
Add Comment