जेवणाची सुट्टी झाली, पोरांनी खिचडी खाल्ली अन् नको तो त्रास सुरु झाला, सांगलीत काय घडलं?

सांगली : सांगली शहरातल्या एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायर प्रकार समोर आहे. सुमारे ३२ विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्याने त्या अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतल्या विद्यार्थ्यांना बचत गटामार्फत देण्यात आलेल्या पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचं समोर आलं आहे.

मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलवून त्यांची तपासणी केली. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या ३२ विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्यातरी या सर्वांची प्रकृती स्थिर आणि उत्तम असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी मोहन गायकवाड यांनी सांगितलं आहे.

सई-स्वप्नील ते अंकुश-उमेश; राष्ट्रवादीने कलाकारांची लिस्ट काढली, गुन्हे नोंदवण्याची मागणी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये धाव घेतली. यातील काही विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.

ठाकरेंसोबत नव्याने संसार थाटलेले आंबेडकर म्हणतात, तर मी भाजपसोबत युती करण्यास तयार…!

Source link

sangli local marathi newssangli wanleswadi high school newssangli wanleswadi high school school nutritionsangli wanleswadi high school student poisoningसांगली लोकल मराठी बातम्यासांगली वानलेसवाडी हायस्कूल शालेय पोषण आहार
Comments (0)
Add Comment