हे वाचा-म्हणूनच तो बादशाह आहे! अवघ्या चारच दिवसात पठाण २०० कोटी क्लबमध्ये
ETimes ने सुभाष घई यांच्या पार्टीतील अभिषेक आणि ऐश्वर्या यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला असून ज्यात अभिनेत्री अभिषेकवर रागावलेली दिसत आहे. ETimes ने ऑक्टोबर २०२२ मध्ये मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमधीलही या दोघांचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यावेळीही ऐश्वर्याची प्रतिक्रिया अशीच काहीशी होती. दरम्यान ऐश्वर्याच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले कारण ती एकदम रागात अभिषेककडे पाहत आहे. ETimes ने या प्रतिक्रियांविषयीचा व्हिडिओ शेअर केला असून नेटकरी त्यांच्या लग्नाला ‘Unhappy Relationship’ असेही म्हणत ट्रोल करतायंत.
हे वाचा-30 Years Of Tiranga: राजकुमार यांच्यासोबत काम करायचं नव्हतं! या अटीवरच नाना पाटेकरांनी दिला होकार
पहिल्यांदा माफी ऐश्वर्याच मागते
ऐश्वर्या काही वर्षांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये तिच्या ‘सरबजीत’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली होती. तेव्हा तिला कपिलने विचारले की, तिचे आणि अभिषेकचे क्षुल्लक भांडण झाले आहे का? ज्यावर तिने हो असे उत्तर दिले होते. यानंतर कपिलने पुढील प्रश्न असा विचारला की, मग त्यावर पहिली माफी कोण मागतं? हे ऐकून ऐश्वर्या हसायला लागते आणि नवज्योतसिंग सिद्धू मध्येच थांबवून म्हणतात की, ‘हा काय प्रश्न झाला? अभिषेकच आधी सॉरी म्हणत असेल.’ यानंतर ऐश्वर्या असं उत्तर देते की, ‘नाही. मी आधी माफी मागते आणि भांडण संपवायला बघते’.