गोविंद पानसरे हत्येप्रकरणी १० जणांवर दोष निश्चिती; समीर गायकवाड, वीरेंद्रसिंह तावडे यांचा समावेश

Kolhapur News : गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी आज मोठी घडामोड घडली. जिल्हा न्यायालयाने १० आरोपींना दोषी ठरवलं आहे. आता या प्रकरणी येत्या २३ तराखेला सुनावणी होणार आहे.

 

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील १० आरोपींवर दोष निश्चिती करण्यात आली. कोल्हापूरचे जिल्हा न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्या न्यायालयासमोर सोमवारी ही सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ जानेवारी रोजी होणार आहे.

ज्येष्ठ कामगार नेते पानसरे यांची हत्या झाल्यानंतर १२ संशयितांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यातील १० आरोपींना अटक करण्यात आली होती. दोघे फरारी आहेत. त्यामध्ये विनय पवार व सारंग अकोलकर यांचा समावेश आहे.

या प्रकरणातील समीर गायकवाड व वीरेंद्रसिंह तावडे यांच्यासह दहा संशयित आरोपीवर आज दोष निश्चिती करण्यात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. यातील सहा संशयित बंगळुरू कारागृहात तर तीन येरवडा कारागृहात आहेत. विशेष सरकारी वकील म्हणून शिवाजीराव राणे हे काम पाहत आहेत. दोष निश्चिती झाल्यामुळे आता सुनावणीला वेग येण्याची शक्यता आहे. गोविंद पानसरे यांची २०१५ मध्ये हत्या करण्यात आली होती.

राज्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा, जोतिबा देवस्थानची शेकडो एकर जमीन परस्पर विकली?

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

govind pansare casegovind pansare case 10 accused convictedKolhapur newssameer gaikwadvirender singh tawde
Comments (0)
Add Comment