रेश्माने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्या दोघी पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवर बसलेल्या दिसत आहेत. त्यांच्यामागे एक ट्रेन जाताना दिसतेय. व्हिडिओमध्ये सुरुवातीला रेश्मा म्हणते, ‘हे बघताय तुम्ही आमच्या मागे ही चर्चगेटला जाणारी ट्रेन आहे. आम्हाला गोरेगावला जायचं होतं. मग आपण काय केलं सांग जरा.’ त्यावर शेजारीच असलेली अनघा म्हणते, ‘आम्हाला बोरिवलीची ट्रेन पकडायची होती आणि आम्ही चुकून चर्चगेटची ट्रेन पकडली आणि आम्हाला खूप उशिरा समजलं की ओह आम्ही तर चर्चगेटची ट्रेन पकडलीये.’ त्यावर रेश्मा पुन्हा म्हणते, ‘लोक असं म्हणतात अति घाई संकटात नेई मग आम्ही पण घाई केली आणि आम्हीपण संकटात सापडलोय. आता आम्हाला घरी पोहोचायला उशीर होतोय. हिची आई तर घरी गेल्यावर हिला खूप मारणार आहे.’
अनघा म्हणते मला तर पप्पांचे फोन येऊन गेले की कुठे पोहोचली. व्हिडिओ संपवताना त्या दोघीही चॅनेलला फॉलो करायला सांगतात. त्यांचा हा व्हिडिओ आणि वेडेपणा दोन्ही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. अनेकांनी त्यावर हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.