सुदैवाने मैदानावर उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. भोसले कुटुंब गेली अनेक वर्ष भावकीतल्या अत्याचाराला कंटाळले आहेत, म्हणून त्यांनी असं टोकाचे पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोसले कुटुंबावर गेली काही वर्ष गावातीलच काही व्यक्ती अत्याचार करत असून मानसिक आणि शारीरिक त्रास देत आहेत. या प्रकरणी प्रांताधिकारी आणि इतर प्रशासनास पत्रव्यवहार करण्यात आला. पण, यावर ठोस अशी कारवाई संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप केली नाही.
ठाण्यात उद्धव ठाकरे बरसले; मोजक्याच शब्दांत एकनाथ शिंदेंचा खरपूस समाचार, मोठी घोषणाही केली!
सतत होणारे जीव घेणे हल्ले आणि राजकीय दबावापोटी पोलीस गुन्हे दाखल करत नाहीत. क्षुल्लक कारणावरून भोसले कुटुंबाला लक्ष करून त्रास दिला जातो, असा आरोप भोसले कुटुंबीयांनी केला आहे. हा अन्याय सहन न झाल्याने आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी बारामती रेल्वे मैदानात भोसले कुटुंब आले आणि पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
“आम्ही आत्महत्या करणार असून आमच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात यावेत”, अशी अपेक्षा पत्राद्वारे त्यांनी व्यक्त केली आहे. “आमच्या आत्महत्येस त्रास देणाऱ्या कुटुंबास कारणीभूत धरावे”, अशा आशयाचे फलक देखील लावण्यात आलेले आहेत. अशी अपेक्षा पत्राद्वारे त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
जळगावातील प्रचार मेळाव्यात पाहा झालं तरी काय? भाजपच्या पाठींब्यावर सत्यजित तांबे म्हणाले…