हरवलेल्या मुलांना आता ‘आधार’; पालकांचा शोध घेणे तुलनेने होणार सोपे
मुंबई : घरातून पळून गेलेल्या तसेच हरवलेल्या शेकडो मुलांच्या पालकांचा शोध आता ‘आधार’मुळे सोपा होणार आहे. या मुलांच्या पालकांचा ठावठिकाणा शोधणाऱ्या संस्थांना पालकांची माहिती मिळावी, यासाठी सातत्याने यंत्रणेकडे खेपा घालाव्या लागत होत्या. आता ही दगदग थांबणार असून या मुलांची आधार नोंदणी केली जाणार आहे. जर या मुलांची आधार नोंदणी यापूर्वीच त्यांच्या पालकांनी केलेली असेल तर ही मुले कोणत्या राज्यातील आहेत याची माहिती ‘युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी’च्या माध्यमातून शोधता येणार आहे. त्यामुळे हरवलेल्या मुलांच्या पालकांचा शोध घेणे तुलनेने सोपे होणार आहे.