एकलव्य शाळेची सुरुवात
एकलव्य शाळा ही एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) म्हणूनही ओळखली जाते. १९९७-९८ मध्ये याची स्थापना झाली होती. या शाळा विशेषत: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बनवलेल्या आहेत. या शाळांच्या माध्यमातून शिक्षणावर भर देण्यासोबतच सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या शाळा राज्य सरकारांच्या अंतर्गत येत असून त्यांना स्थापनेसाठी केंद्र सरकारकडून निधी दिला जातो.
एकलव्य शाळेत ४८० विद्यार्थ्यांची क्षमता असून इयत्ता सहावी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी येथे शिकू शकतात, म्हणजेच ही शाळा सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या शाळांची संख्या वाढवण्यासाठी २०२२ च्या अखेरीस ५० टक्के एसटी लोकसंख्या असलेल्या आणि किमान २० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या प्रत्येक ब्लॉकमध्ये EMRS म्हणजेच एकलव्य शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्या शाळांची संख्या किती आहे?
या शाळा भारत सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार, एकूण ६८९ एकलव्य शाळांना सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी ४०१ शाळा कार्यरत आहेत.
या शाळांमध्ये एकूण १ लाख १३ हजार २७५ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. यामध्ये ५६ हजार १०६ पुरुष आणि ५७ हजार १६८ महिलांचा समावेश आहे. हा डेटा अधिकृत वेबसाइटवर दिलेला आहे, त्यामुळे नंबरमध्ये बदल होऊ शकतो, याची नोंद घ्या.